शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

लग्नावरून परत येताना काळाचा घाला; ट्रकची कारला धडक, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:27 IST

लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरूल नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली.

दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितलं की, फरिदाबादहून येणारी कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या बाजूला पडली. त्याचवेळी तिची ट्रकशी धडक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 1.45 च्या सुमारास डीडी क्रमांक 4 द्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की, होंडा शोरुमजवळील बदरपूर उड्डाणपुलावर कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात फरिदाबादहून परतणाऱ्या कारमध्ये सात जण होते, जे दिल्लीतील एका लग्न समारंभातून घरी परतत होते.

लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे 21 वर्षीय राज, 38 वर्षीय संजू आणि 22 वर्षीय दिनेश अशी आहेत. तर नीरज, अजित, विशाल, अन्सुल अशी अन्य चार जखमींची नावे आहेत. ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्ली