शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

लग्नावरून परत येताना काळाचा घाला; ट्रकची कारला धडक, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:27 IST

लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरूल नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली.

दिल्लीतील बदरपूर उड्डाणपुलावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सांगितलं की, फरिदाबादहून येणारी कार अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या बाजूला पडली. त्याचवेळी तिची ट्रकशी धडक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 1.45 च्या सुमारास डीडी क्रमांक 4 द्वारे बदरपूर पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की, होंडा शोरुमजवळील बदरपूर उड्डाणपुलावर कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या टीमच्या प्राथमिक तपासात फरिदाबादहून परतणाऱ्या कारमध्ये सात जण होते, जे दिल्लीतील एका लग्न समारंभातून घरी परतत होते.

लग्नाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे. बदरपूर उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला कार धडकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे 21 वर्षीय राज, 38 वर्षीय संजू आणि 22 वर्षीय दिनेश अशी आहेत. तर नीरज, अजित, विशाल, अन्सुल अशी अन्य चार जखमींची नावे आहेत. ज्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्ली