शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 23:03 IST

Arvind Kejriwal Criticize Narendra Modi: राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

दिल्लीतील सत्ता राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेमध्ये पारित झाले. त्याबरोबरच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबतचे अधिकार हे केंद्र सरकारला कायदेशीररीत्या प्राप्त झाले आहेत. हे विधेयक पारित होणे हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवणं कठीण दिसत असल्याने भाजपाने चोर दरवाजाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

दिल्ली सेवा विधेयक पारित झाल्यानंतर संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोदी सांगतात मी सुप्रीम कोर्टालाही मानत नाही. ज्या देशाचे पंतप्रधान त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही. त्या देशाचं काय भविष्य असू शकतं. सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश पारित केला तरी जर आम्हाला तो आदेश आवडला नाही तर मी त्याविरोधात कायदा बनवून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पलटून टाकेन, असे ते सरळ सरळ सांगत आहेत. एवढा अहंकार यांना झाला आहे.

आम आदमी पक्षाला आपण थेट लढतीत हरवू शकत नाही, हे भाजपा समजून चुकला आहे. दिल्लीतील गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपाचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आलेली नाही. २५ वर्षांपासून भाजपा दिल्लीमध्ये वनवास भोगत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत हरवणं कठीण आहे, याची जाणीव यांना झाली. त्यामुळे यांनी मागून, चोर दरवाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

आज पारित करण्यात आलेल्या कायद्यात लिहिले आहे की, दिल्ली सरकारमधील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत जेवढे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांबाबतची सर्व धोरणं केंद्र सरकार बनवेल. सर्वांच्या बदल्यांबाबतचं धोरण, कुठला शिपाई कुठलं काम करेल, कुठली फाईल उचलेल याबाबतचे निर्णय हे पंतप्रधान घेणार आहेत. पंतप्रधानांचा हेच काम उरलं आहे का? यासाठी त्यांना जनतेने देशाची सत्ता दिली आहे का? तुम्ही केंद्रातील सत्ता राबवा ना, दिल्लीच्या कामकाजात ढवळाढवळ कशाला करताय? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआप