शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 23:03 IST

Arvind Kejriwal Criticize Narendra Modi: राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

दिल्लीतील सत्ता राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेमध्ये पारित झाले. त्याबरोबरच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबतचे अधिकार हे केंद्र सरकारला कायदेशीररीत्या प्राप्त झाले आहेत. हे विधेयक पारित होणे हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवणं कठीण दिसत असल्याने भाजपाने चोर दरवाजाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

दिल्ली सेवा विधेयक पारित झाल्यानंतर संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोदी सांगतात मी सुप्रीम कोर्टालाही मानत नाही. ज्या देशाचे पंतप्रधान त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही. त्या देशाचं काय भविष्य असू शकतं. सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश पारित केला तरी जर आम्हाला तो आदेश आवडला नाही तर मी त्याविरोधात कायदा बनवून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पलटून टाकेन, असे ते सरळ सरळ सांगत आहेत. एवढा अहंकार यांना झाला आहे.

आम आदमी पक्षाला आपण थेट लढतीत हरवू शकत नाही, हे भाजपा समजून चुकला आहे. दिल्लीतील गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपाचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आलेली नाही. २५ वर्षांपासून भाजपा दिल्लीमध्ये वनवास भोगत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत हरवणं कठीण आहे, याची जाणीव यांना झाली. त्यामुळे यांनी मागून, चोर दरवाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

आज पारित करण्यात आलेल्या कायद्यात लिहिले आहे की, दिल्ली सरकारमधील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत जेवढे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांबाबतची सर्व धोरणं केंद्र सरकार बनवेल. सर्वांच्या बदल्यांबाबतचं धोरण, कुठला शिपाई कुठलं काम करेल, कुठली फाईल उचलेल याबाबतचे निर्णय हे पंतप्रधान घेणार आहेत. पंतप्रधानांचा हेच काम उरलं आहे का? यासाठी त्यांना जनतेने देशाची सत्ता दिली आहे का? तुम्ही केंद्रातील सत्ता राबवा ना, दिल्लीच्या कामकाजात ढवळाढवळ कशाला करताय? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआप