शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भाजपाने चोर दरवाजाने सत्ता बळकावली, अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 23:03 IST

Arvind Kejriwal Criticize Narendra Modi: राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

दिल्लीतील सत्ता राबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेमध्ये पारित झाले. त्याबरोबरच दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबतचे अधिकार हे केंद्र सरकारला कायदेशीररीत्या प्राप्त झाले आहेत. हे विधेयक पारित होणे हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक पारित होताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीत आम आदमी पक्षाला हरवणं कठीण दिसत असल्याने भाजपाने चोर दरवाजाने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

दिल्ली सेवा विधेयक पारित झाल्यानंतर संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोदी सांगतात मी सुप्रीम कोर्टालाही मानत नाही. ज्या देशाचे पंतप्रधान त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही. त्या देशाचं काय भविष्य असू शकतं. सुप्रीम कोर्टाने कुठलाही आदेश पारित केला तरी जर आम्हाला तो आदेश आवडला नाही तर मी त्याविरोधात कायदा बनवून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पलटून टाकेन, असे ते सरळ सरळ सांगत आहेत. एवढा अहंकार यांना झाला आहे.

आम आदमी पक्षाला आपण थेट लढतीत हरवू शकत नाही, हे भाजपा समजून चुकला आहे. दिल्लीतील गेल्या चार निवडणुकांमध्ये भाजपाचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता आलेली नाही. २५ वर्षांपासून भाजपा दिल्लीमध्ये वनवास भोगत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्लीत हरवणं कठीण आहे, याची जाणीव यांना झाली. त्यामुळे यांनी मागून, चोर दरवाजाने दिल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

आज पारित करण्यात आलेल्या कायद्यात लिहिले आहे की, दिल्ली सरकारमधील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत जेवढे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्या सर्व कर्मचाऱ्यांबाबतची सर्व धोरणं केंद्र सरकार बनवेल. सर्वांच्या बदल्यांबाबतचं धोरण, कुठला शिपाई कुठलं काम करेल, कुठली फाईल उचलेल याबाबतचे निर्णय हे पंतप्रधान घेणार आहेत. पंतप्रधानांचा हेच काम उरलं आहे का? यासाठी त्यांना जनतेने देशाची सत्ता दिली आहे का? तुम्ही केंद्रातील सत्ता राबवा ना, दिल्लीच्या कामकाजात ढवळाढवळ कशाला करताय? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआप