शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रदुषणामुळे दिल्ली पुन्हा संकटात, पर्यावरण मंत्र्यांनी केलं 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 12:42 IST

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचं संकट आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिक वाढू लागलं आहे.

नवी दिल्ली-

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदुषणाचं संकट आता पुन्हा एकदा दिवसेंदिवस अधिक वाढू लागलं आहे. यातच आता दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत नागरिकांना 'वर्क फ्रॉम होम'चं आवाहन केलं आहे. यासोबतच जे व्यक्ती दररोज कामावर जात आहेत त्यांना बाइक किंवा कार शेअरिंगचा पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रस्त्यावर कमीत कमी वाहनं येतील आणि प्रदुषण कमी करण्यास कमी मदत होऊ शकेल.

पर्यावरण मंत्री गोपाल यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून प्रदुषणाची पातळी खालावत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीच नव्हे, तर उत्तर प्रदेश, हरियाणासह काही परिसरात हवेची गुणवत्ता खालावली आहे. १ नोव्हेंबर रोजी फरीदाबादमध्ये ४०३, मानेसरमध्ये ३९३, गुरुग्राम ३९०, बहादूर गडमध्ये ४००, सोनीपत ३५०, कॅथलमध्ये ३५०, ग्रेटर नोएडामध्ये ४०२, नोएडामध्ये ३९८, गाझियाबादमध्ये ३८१ इतकी AQI पातळी नोंदवली गेली होती. 

भाजपानं CAQM चा आदेश पाळला नाही- गोपाल रायदिल्लीत काल अँटी डस्ट अभियानाअंतर्गत निरीक्षण करण्यात आलं. यात L&T च्या साइटवर पडद्याआडून बांधकाम सुरू होतं. माती मोकळी पडलेली होती. तसंच अँटी स्मॉग गन देखील वापरण्यात आली नव्हती. त्यानंतर माहिती मिळाली की ते भाजपाचं कार्यालय उभारत आहेत. भाजपानं CAQM च्या आदेशांचं पालन केलं नाही, असा खळबळजनक आरोप गोपाल राय यांनी केला आहे. 

ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू असल्याचं दिसून येईल त्याचे फोटो काढून ग्रीन अॅपवर पाठवण्याचं आवाहन देखील गोपाल राय यांनी यावेळी केलं. काल भाजपाच्या कार्यालयात बांधकाम सुरू होतं. भाजपावाले इतरही काही ठिकाणी असं काम करत असतील, असाही आरोप त्यांनी केला आहे. कोळसा आणि लाकडाचा वापर करु नये. त्यामुळे बायोमास बर्निंग होतं आणि मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं, असं गोपाल राय म्हणाले. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना इलेक्ट्रिक हिटर उपलब्ध करुन देण्यात यावा जेणेकरुन थंडीपासून वाचण्यासाठी खुल्या जागेत शेकोटी केली जाणार नाही आणि वायू प्रदुषण होणार नाही.

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्ली