शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

"कान्हा तेरी यमुना काली हो गई…", आप सरकारविरोधात भाजपकडून आरोपपत्र जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:16 IST

Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे सत्ताधारी आप सरकारकडून महिला आणि वृद्धांसाठी दोन योजना सुरू केल्या जात आहेत. त्याचवेळी भाजपने आप सरकारविरोधात आरोपपत्र जारी केले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि प्रवीण खंडेलवाल या भाजप नेत्यांनी एका कार्यक्रमात हे आरोपपत्र जाहीर केले. यावेळी विजेंद्र गुप्ता, रमेश बिधुरी, आरती मेहरा आणि सरदार आरपी सिंह यांसारखे इतर मोठे नेतेही उपस्थित होते.

भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. अनुराग ठाकूर म्हणाले की, "आप सरकारने यमुना नदी इतकी प्रदूषित केली आहे की, ती दुर्गंधीयुक्त, फेसाळ आणि विषारी झाली आहे. मला आठवते २०२२ मध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले होते की पुढच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०२५ च्या निवडणुकीपूर्वी ते लोकांसोबत यमुना नदीत डुबकी मारतील." 

याशिवाय, १० वर्षे झाली आणि २०२५ मध्ये जायला फक्त १० दिवस उरले आहेत, यमुना स्वच्छ झाली का?  असा सवाल सुद्धा अरविंद केजरीवाल यांना केला आहे. तसेच, 'कान्हा तेरी यमुना काली हो गई, केजरीवाल के पाप धोते-धोते', असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. अनुराग ठाकूर म्हणाले की, यमुना आता इतकी प्रदूषित झाली आहे की, येथे सण साजरे करणेही बंद झाले आहे. वायुप्रदूषण आणि खराब सांडपाणी व्यवस्थेमुळे दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे आजार होत आहेत. पाणी प्रदूषित झाले आहे. आज दिल्ली वाचवण्याची आणि अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचार संपवण्याची वेळ आली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून प्रत्युत्तर!दरम्यान, भाजपने 'आप' सरकारविरोधात आरोपपत्र जारी केल्यावर आप प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपकडे निवडणूक लढवण्याचा कोणताही अजेंडा नाही. गेल्या ५ वर्षांत दिल्लीसाठी काय केले, हे त्यांनी दिल्लीतील जनतेला सांगावे. वीज, पाणी, महिलांचा प्रवास, रस्ते आणि इतर अनेक बाबतीत आपने दिल्लीच्या लोकांसाठी खूप काही केले आहे. तसेच, या लोकांनी काय काम केले आहे? दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. आता ते निवडणुकीसाठी आले असताना माझ्यावर आरोपपत्र जारी करत आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री चेहरा नाही, असे केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाdelhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीAnurag Thakurअनुराग ठाकुरArvind Kejriwalअरविंद केजरीवाल