शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
4
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
5
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
6
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
8
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
9
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
10
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
11
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
12
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
13
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
14
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
15
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
16
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
17
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
18
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
19
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
20
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?

बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:50 IST

अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांना सीमेपार त्यांच्या देशात पाठवण्याची भारतीय सैन्याची मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे. नुकतीच दिल्लीतून ३८ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही महिला आणि लहान मुले यांचा देखील समावेश आहे. दिल्लीमध्ये संसार थाटण्यापूर्वी या लोकांनी बिहार आणि नुहमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला होता. या लोकांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. 

बिहारमध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न केला!

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या ताब्यात घेतलेले घुसखोर आधी हरियाणाच्या नुहमध्ये आणि नंतर बिहारमध्ये देखील गेले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले. या लोकांनी सुरुवातीला बिहारमध्ये मुक्काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या भागांमध्ये त्यांना आपला जम बसवता आला नाही. या ठिकाणी काहीच काम न मिळाल्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथल्या करखान्यांमध्ये काम करू लागले. इतकंच नाही तर, तिथेच झोपडी वजा घरे बांधून अवैधरित्या राहू लागले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये काही लहान मुले आणि महिला देखील सामील आहेत. सगळ्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेली होती. या लोकांकडे आवश्यक कागदपत्रे देखील नव्हती. 

शेकडो लोकांना मायदेशी धाडलं!

बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत शेकडो बांगलादेशी पकडले गेले आहेत. अनेकांना बांगलादेशला परत पाठवण्यात आले आहे. या लोकांच्या अटकेमुळे घुसखोरांना बनावट आधार कार्डसह विविध प्रकारची कागदपत्रे पुरवणारे अनेक नेटवर्क उघड झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्य दलाची ही मोहीम आणखी तीव्र झाली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवानdelhiदिल्ली