शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:50 IST

अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचं काम भारतीय सैन्य करत आहे. आता दिल्लीतून ३८ घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांना सीमेपार त्यांच्या देशात पाठवण्याची भारतीय सैन्याची मोहीम आता आणखी तीव्र झाली आहे. नुकतीच दिल्लीतून ३८ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये काही महिला आणि लहान मुले यांचा देखील समावेश आहे. दिल्लीमध्ये संसार थाटण्यापूर्वी या लोकांनी बिहार आणि नुहमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतच मुक्काम ठोकला होता. या लोकांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. 

बिहारमध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न केला!

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या ताब्यात घेतलेले घुसखोर आधी हरियाणाच्या नुहमध्ये आणि नंतर बिहारमध्ये देखील गेले होते. त्यानंतर ते दिल्लीत आले. या लोकांनी सुरुवातीला बिहारमध्ये मुक्काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या भागांमध्ये त्यांना आपला जम बसवता आला नाही. या ठिकाणी काहीच काम न मिळाल्यामुळे त्यांनी दिल्ली गाठली आणि तिथल्या करखान्यांमध्ये काम करू लागले. इतकंच नाही तर, तिथेच झोपडी वजा घरे बांधून अवैधरित्या राहू लागले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये काही लहान मुले आणि महिला देखील सामील आहेत. सगळ्यांनी बांगलादेशातून भारतात घुसखोरी केलेली होती. या लोकांकडे आवश्यक कागदपत्रे देखील नव्हती. 

शेकडो लोकांना मायदेशी धाडलं!

बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत शेकडो बांगलादेशी पकडले गेले आहेत. अनेकांना बांगलादेशला परत पाठवण्यात आले आहे. या लोकांच्या अटकेमुळे घुसखोरांना बनावट आधार कार्डसह विविध प्रकारची कागदपत्रे पुरवणारे अनेक नेटवर्क उघड झाले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर सैन्य दलाची ही मोहीम आणखी तीव्र झाली आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवानdelhiदिल्ली