शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कफ सिरप ठरलं जीवघेणं! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा मृत्यू, 16 मुलं पडली आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 08:33 IST

Cough Syrup : खोकल्यावर डॉक्टर देखील आपल्याला कफ सिरप (Cough syrup) देतात. पण हेच कफ सिरप आता 3 मुलांच्या जीवावर बेतलं आहे.

नवी दिल्ली - लहान मुलांना सर्दी-खोकला (Cough) हा त्रास हमखास होत असतो. अशावेळी पालक माहीत असलेलं एखादं कफ सिरप मुलांना देतात किंवा मग जास्तच बरं वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतात. खोकल्यावर डॉक्टर देखील आपल्याला कफ सिरप (Cough syrup) देतात. पण हेच कफ सिरप आता 3 मुलांच्या जीवावर बेतलं आहे. खोकल्याचं औषध घेतल्यामुळे 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये खोकल्याचं औषध प्यायल्याने 16 मुलं आजारी पडली आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपच्या साईड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे. यानंतर केंद्र सरकारच्या डायरेक्टर जनरल हेल्थ सर्व्हिसेजने दिल्लीच्या DGHS निर्देश दिले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डिस्ट्रोमेथोर्फन सिरप देऊ नये अशी नोटीस मोहल्ला क्लिनिक आणि डिस्पेन्सरीना जारी करण्यात आली आहे. डॉ. अनिल गोयल डिस्ट्रोमेथोर्फन सिरप कधी आणि कोणत्या मुलांना दिलं गेलं पाहिजे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

सिरप प्याल्यानंतर 16 मुलं आजारी

डिस्ट्रोमेथोर्फन सिरप खूप जास्त खोकला असेल तर दिलं जातं. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध दिलं जात नाही असं डॉ. अनिल गोयल यांनी म्हटलं आहे. सिरप प्याल्यानंतर 16 मुलं आजारी पडली. त्यात दोन वर्षांपेक्षा लहान मुलांचा समावेश आहे. तपासानुसार ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यांचं वयही दोन ते तीन वर्षेच आहे. हे औषध देताना खूप काळजी घ्यावी लागते. याचे मर्यादित डोस द्यायला हवेत. मुलांना औषधाचा किती डोस देण्यात आला आणि कुठे याचा तपास व्हायला हवा असंही ते म्हणाले.

मुलांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

औषध देताना काही चूक तर झाली नाही ना, ज्याचा परिणाम मुलांना भोगावा लागला, हेसुद्धा तपासायला हवं असं डॉ. गोयल यांनी म्हटलं आहे. डिस्ट्रोमेथोर्फन सिरप प्यायल्यानंतर त्यावर पाणी प्यायचं नाही. तसेच हे सिरप प्यायल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी हे देखील सांगणं गरजेचं आहे असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुलांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली असून पालकांना देखील मोठा धक्का बसला आहे. याआधी देखील सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्ली