शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:52 IST

Kailash Gahlot quits AAP : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

Kailash Gahlot quits AAP : नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.

आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवताना कैलाश गेहलोत यांचेही नाव या पदासाठी पुढे येत होते. मात्र, या मोठ्या जबाबदारीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती. 

दरम्यान, आतिशी सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात आपच्या अंतर्गत समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच, यावर मात करण्याची गरज असल्याचे कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून झालेल्या विवादाचा संदर्भ देताना त्यांनी शीशमहल असा शब्दाचा वापर केला आहे.

वचनबद्धता पूर्ण करण्यात अपयशी - कैलाश गेहलोत याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश कैलाश गेहलोत यांनी अधोरेखित केले. आम्ही जनतेला स्वच्छ यमुनेचे आश्वासन दिले होते, पण ती वचनबद्धता पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचे कैलाश गेहलोत यांनी सांगितले आहे. तसेच, कैलाश गेहलोत पुढे म्हणाले की, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील सततचा संघर्ष शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी