शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:52 IST

Kailash Gahlot quits AAP : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

Kailash Gahlot quits AAP : नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा धक्का बसला आहे. दिल्ली सरकारचे ज्येष्ठ मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आपला सुद्धा रामराम ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत कैलाश गेहलोत यांनी हे पाऊल उचलले. 

दिल्लीच्या आतिशी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री म्हणून कार्यरत होते. कैलाश गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  एक्सच्या माध्यमातून लोकांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये राजधानीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कैलाश गेहलोत यांचा राजीनामा आपला मोठा धक्का समजला जात आहे.

आतिशी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवताना कैलाश गेहलोत यांचेही नाव या पदासाठी पुढे येत होते. मात्र, या मोठ्या जबाबदारीसाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांची निवड केली. जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी दिल्लीच्या उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती. 

दरम्यान, आतिशी सरकारमधील मंत्री कैलाश गेहलोत यांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात आपच्या अंतर्गत समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच, यावर मात करण्याची गरज असल्याचे कैलाश गेहलोत म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून झालेल्या विवादाचा संदर्भ देताना त्यांनी शीशमहल असा शब्दाचा वापर केला आहे.

वचनबद्धता पूर्ण करण्यात अपयशी - कैलाश गेहलोत याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात कैलाश गेहलोत यांनी दिल्लीतील जनतेला दिलेली मुख्य आश्वासने पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यमुना नदी स्वच्छ करण्यात आलेले अपयश कैलाश गेहलोत यांनी अधोरेखित केले. आम्ही जनतेला स्वच्छ यमुनेचे आश्वासन दिले होते, पण ती वचनबद्धता पूर्ण करण्यात आम्ही अपयशी ठरलो असल्याचे कैलाश गेहलोत यांनी सांगितले आहे. तसेच, कैलाश गेहलोत पुढे म्हणाले की, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमधील सततचा संघर्ष शहराच्या विकासात अडथळा ठरत आहे. दिल्ली सरकारने आपला बराचसा वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यात घालवला तर दिल्लीची खरी प्रगती शक्य नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशी