शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:32 IST

Jahangirpuri Violence: दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी मिळाली? भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना प्रश्न.

Violence In Jahangirpuri: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीसजखमी झाले.  आता त्या हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. 

मिरवणुकीवर दगडफेक हा 'दहशतवादी हल्ला'!भाजप दिल्ली युनिटच्या नेत्यांनी हिंसाचाराला 'षडयंत्र' असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, हा हल्ला अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित कट होता. याशिवाय, पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी मिरवणुकीवरील दगडफेकीला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशातून तत्काळ हद्दपार करण्याची मागणी केली. आदेश गुप्ता म्हणाले की, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणार आहेत.

रोहिंग्यांना वीज जोडणी कशी मिळाली?दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी दिली गेली, असा सवालही त्यांनी केला. "मला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारायचे आहे की ते शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाणी आणि वीज का पुरवत आहेत?," असा सवाल त्यांनी एका व्हिडिओ संदेशात केला.

आपकडून प्रतिक्रिया नाहीआदेश गुप्ता यांच्या आरोपांवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेत्याने दिल्लीकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि पक्षाचे शिष्टमंडळ या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची कागदपत्रे तपासली जावीत आणि त्यांना तत्काळ हटवावे. हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला हा योगायोग नसून पुर्वनियोजित कट होता. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीBJPभाजपाAAPआप