शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:32 IST

Jahangirpuri Violence: दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी मिळाली? भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना प्रश्न.

Violence In Jahangirpuri: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीसजखमी झाले.  आता त्या हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. 

मिरवणुकीवर दगडफेक हा 'दहशतवादी हल्ला'!भाजप दिल्ली युनिटच्या नेत्यांनी हिंसाचाराला 'षडयंत्र' असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, हा हल्ला अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित कट होता. याशिवाय, पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी मिरवणुकीवरील दगडफेकीला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशातून तत्काळ हद्दपार करण्याची मागणी केली. आदेश गुप्ता म्हणाले की, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणार आहेत.

रोहिंग्यांना वीज जोडणी कशी मिळाली?दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी दिली गेली, असा सवालही त्यांनी केला. "मला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारायचे आहे की ते शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाणी आणि वीज का पुरवत आहेत?," असा सवाल त्यांनी एका व्हिडिओ संदेशात केला.

आपकडून प्रतिक्रिया नाहीआदेश गुप्ता यांच्या आरोपांवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेत्याने दिल्लीकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि पक्षाचे शिष्टमंडळ या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची कागदपत्रे तपासली जावीत आणि त्यांना तत्काळ हटवावे. हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला हा योगायोग नसून पुर्वनियोजित कट होता. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीBJPभाजपाAAPआप