शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Jahangirpuri Violence: जहांगीरपुरी हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात? भाजप नेत्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 09:32 IST

Jahangirpuri Violence: दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी मिळाली? भाजपचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना प्रश्न.

Violence In Jahangirpuri: काल(16 एप्रिल) हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीसजखमी झाले.  आता त्या हिंसाचारामागे रोहिंग्या आणि बांगलादेशींचा हात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. 

मिरवणुकीवर दगडफेक हा 'दहशतवादी हल्ला'!भाजप दिल्ली युनिटच्या नेत्यांनी हिंसाचाराला 'षडयंत्र' असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी म्हणाले की, हा हल्ला अचानक घडलेला नसून पूर्वनियोजित कट होता. याशिवाय, पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी मिरवणुकीवरील दगडफेकीला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. यावेळी त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशातून तत्काळ हद्दपार करण्याची मागणी केली. आदेश गुप्ता म्हणाले की, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी करणार आहेत.

रोहिंग्यांना वीज जोडणी कशी मिळाली?दिल्लीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या वसाहतींना पाणी आणि विजेची जोडणी कशी दिली गेली, असा सवालही त्यांनी केला. "मला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारायचे आहे की ते शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाणी आणि वीज का पुरवत आहेत?," असा सवाल त्यांनी एका व्हिडिओ संदेशात केला.

आपकडून प्रतिक्रिया नाहीआदेश गुप्ता यांच्या आरोपांवर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजप नेत्याने दिल्लीकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आणि पक्षाचे शिष्टमंडळ या भागाला भेट देणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, भाजप नेते कपिल मिश्रा म्हणाले की, सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची कागदपत्रे तपासली जावीत आणि त्यांना तत्काळ हटवावे. हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेला हल्ला हा योगायोग नसून पुर्वनियोजित कट होता. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीBJPभाजपाAAPआप