शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

नवी दिल्लीत भुकेनं जातोय गरिबांचा जीव, न्यायालयानं केंद्र आणि राज्याकडे मागितला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:58 IST

दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राजधानीतल्या आप सरकारला राज्यात होत असलेल्या भूकबळीसंदर्भात एक नोटीस पाठवली आहे.

नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राजधानीतल्या आप सरकारला राज्यात होत असलेल्या भूकबळीसंदर्भात एक नोटीस पाठवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात भूकबळीनं जाणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूसंदर्भात एक याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारकडे जाब मागितला आहे.मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही. के. राव यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे. याचिकाकर्त्यानं याचिकेतून मांडलेल्या प्रश्नांचा न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारला आहे. नवी दिल्लीत झोपडपट्ट्यांतील लोकांची भुकेनं बळी जाण्याची संख्या जास्त आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या या लोकांना अनुदान असलेलं रेशनिंगचं धान्य मिळत नाही.सरकारनं त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून न दिल्यानं त्यांना रेशनिंगवरचं स्वतः दरातलं धान्य मिळत नाही. त्यामुळे अन्नाविना त्यांचा जीव जात असल्याचं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. न्यायालयानं दिल्ली सरकारमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सोशल वेल्फेअर आणि महिला आणि बालकल्याण मंत्रालयालाही नोटीस पाठवली आहे. न्यायालयानं या प्रकरणावर पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी 2019ला ठेवली आहे.