शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निजामुद्दीन मरकझ उघडण्यास दिल्ली हायकोर्टाची मुभा, केवळ ५० जण नमाज अदा करू शकणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:06 IST

Delhi hc orders to open nizamuddin markaz offering ramzan namaz : सध्या कोर्टाने फक्त एकच मजला उघडण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देरमजानच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांना नमाज अदा करण्यासाठी मरकजमध्ये प्रवेश मिळेल.

रमजान दरम्यान दिल्लीउच्च न्यायालयाने निजामुद्दीनचा मरकज उघडण्याचा मोठा निर्णय दिला. हायकोर्टाने मरकजमधील ५० लोकांना रमजान महिन्यात ५ वेळा नमाज अदा करण्यास परवानगी दिली आहे. सध्या कोर्टाने फक्त एकच मजला उघडण्याचे आदेश दिले आहेत.कोरोना महामारीच्या काळात स्पष्टीकरण देताना कोर्टाने म्हटले आहे की, रमजानच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांना नमाज अदा करण्यासाठी मरकजमध्ये प्रवेश मिळेल. या कालावधीत कोर्टाने सामाजिक अंतर पाळण्याचे व डीडीएमएच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाने असेही म्हटले आहे की, या काळात डीडीएमएचे कोणतेही नवीन मार्गदर्शक सूचना किंवा ऑर्डर जारी झाल्यास निजामुद्दीनच्या मरकझ मशिदीनेही ते पालन करावे. त्याचवेळी मरकजची बाजू मांडण्यासाठी हजर असलेले वकील रमेश गुप्ता म्हणाले की, कोर्टाच्या आदेशाचे आपण काटेकोरपणे पालन करू.दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे की, केंद्राने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लोकांना इतर धार्मिक स्थळांवर जाण्याची परवानगी आहे की नाही हे स्पष्ट केले नाही. १० एप्रिलच्या डीडीएमएच्या अधिसूचनेत गर्दी वाढवू नका असे सांगितले आहे, परंतु कोणत्याही धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नाहीत. केंद्र सरकारचे वकील रजत नायर यांनी सुनावणीदरम्यान कोर्टाला सांगितले की, चैत्र नवरात्रीत आरती दरम्यान गर्दी होऊ नये यासाठी कालकाजी मंदिरात ऑनलाइन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच गोल मार्केटच्या चर्चनेही लोकांना तेथे येण्यास रोखले. 

रमजान दरम्यान निजामुद्दीन मरकझ उघडण्याच्या संबंधित प्रकरणात केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात दिल्ली पोलिसांमार्फत सांगण्यात आले होते की, दिल्लीत कोरोनाची वाढती घटना लक्षात घेता डीडीएमएने १० एप्रिल रोजी सर्व धार्मिक स्थळांवर गर्दी रोखण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील अलीकडची परिस्थिती पाहता कोर्टाने मरकज उघडायचे की नाही याचा निर्णय स्वतः घ्यावा. या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, सामाजिक अंतर पळून मरकजचा पहिला मजला उघडण्यास परवानगी दिली गेली तर त्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस व प्रशासनाकडे ठेवावेत. यावर आता कोर्टाने निकाल दिला आहे.

गेल्या वर्षी उडालेली खळबळ

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीच्यादरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजमध्ये जवळपास १४०० लोक राहिले होते. ज्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. विदेशींमध्ये जास्तकरून मलेशिया आणि इंडिनेशियाचे नागरिक होते. दिल्लीत येण्याआधी हा ग्रुप २७ फेब्रुवारी ते १ मार्चच्या २०२० दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात सामील झाला होता. यामधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनला समजल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याNamajनमाजRamzanरमजान