शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिल्लीत अंदाजापेक्षा दुप्पट वेगाने आले वादळ, पाच राज्यांत ८० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:54 IST

देशातील पाच राज्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने रविवारपासून ८० जणांचा मृत्यू झाला तर १३६ जण जखमी झाले.

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने रविवारपासून ८० जणांचा मृत्यू झाला तर १३६ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक बळी गेले असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा दिल्लीत दुप्पट वेगाने वादळ धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्ये ५१, पश्चिम बंगालमध्ये १४, आंध्र प्रदेशमध्ये १२, दिल्लीमध्ये २ तर उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. १३६ जखमींपैकी उत्तर प्रदेशमध्ये १२३, दिल्लीत ११ व उत्तराखंडमध्ये २ जण जखमी झाले आहेत. वादळ व वीज कोसळणे याचा तडाखा उत्तर प्रदेशमधील २४, प. बंगालमधील ६, आंध्र प्रदेशमधील ३, दिल्लीतील २ व उत्तराखंडमधील एका जिल्ह्याला बसला.इशारा : देशाच्या उत्तर व पश्चिम भागातील राज्यांत येत्या दोन ते तीन दिवसांतही वादळी वारे वाहतील.>वादळाचा सिलसिला सुरूचबारा दिवसांपूर्वी आलेल्या धुळीच्या वादळाच्या तडाख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये १३४ जणांचा बळी गेला होता व ४००हून अधिक जखमी झाले होते. या वादळाचा सर्वात जास्त फटका यूपीला बसला होता. त्यानंतर, ९ मे रोजी यूपीच्या काही भागांना पुन्हा वादळाचा तडाखा बसून, त्यात १८ ठार व २७ जखमी झाले होते.धुळीचे वादळ व विजांच्या कडकडाटाने दिल्ली व उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये रविवारपासून थैमान घातल्याने मोठे नुकसानही झाले आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने झाडे पडली असून, रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.