शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

दिल्लीत अंदाजापेक्षा दुप्पट वेगाने आले वादळ, पाच राज्यांत ८० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 06:54 IST

देशातील पाच राज्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने रविवारपासून ८० जणांचा मृत्यू झाला तर १३६ जण जखमी झाले.

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये वादळाच्या तडाख्याने रविवारपासून ८० जणांचा मृत्यू झाला तर १३६ जण जखमी झाले. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक बळी गेले असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजापेक्षा दिल्लीत दुप्पट वेगाने वादळ धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे.उत्तर प्रदेशमध्ये ५१, पश्चिम बंगालमध्ये १४, आंध्र प्रदेशमध्ये १२, दिल्लीमध्ये २ तर उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. १३६ जखमींपैकी उत्तर प्रदेशमध्ये १२३, दिल्लीत ११ व उत्तराखंडमध्ये २ जण जखमी झाले आहेत. वादळ व वीज कोसळणे याचा तडाखा उत्तर प्रदेशमधील २४, प. बंगालमधील ६, आंध्र प्रदेशमधील ३, दिल्लीतील २ व उत्तराखंडमधील एका जिल्ह्याला बसला.इशारा : देशाच्या उत्तर व पश्चिम भागातील राज्यांत येत्या दोन ते तीन दिवसांतही वादळी वारे वाहतील.>वादळाचा सिलसिला सुरूचबारा दिवसांपूर्वी आलेल्या धुळीच्या वादळाच्या तडाख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये १३४ जणांचा बळी गेला होता व ४००हून अधिक जखमी झाले होते. या वादळाचा सर्वात जास्त फटका यूपीला बसला होता. त्यानंतर, ९ मे रोजी यूपीच्या काही भागांना पुन्हा वादळाचा तडाखा बसून, त्यात १८ ठार व २७ जखमी झाले होते.धुळीचे वादळ व विजांच्या कडकडाटाने दिल्ली व उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये रविवारपासून थैमान घातल्याने मोठे नुकसानही झाले आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने झाडे पडली असून, रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे.