शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Delhi Election Results : 'आप'च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, 'लगे रहो केजरीवाल' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:43 IST

दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून, पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पक्षाच्या शानदार विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यात आरपीआयचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचाही समावेश झाला आहे.

नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहे. आठवले म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येथील सातच्या सात जागा जिंकल्या होत्या. मात्र केजरीवाल यांनी दिल्लीत वीज मोफत, पाणी मोफत, बस मोफत, मेट्रो मोफत दिली. सगळ मोफत-मोफत दिल्यामुळे दिल्लीकरांनी ठरवले की, दिल्लीसाठी केजरीवाल आणि केंद्र सरकारसाठी मोदीजी. भाजपने प्रयत्न केला. मात्र मुस्लिमांची मते भाजपला मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आल्याचे आठवलेंनी नमूद केले. 

भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात भाषा चुकीची वापरली. त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र मुस्लीम मते मिळाली नसल्याने भाजपचा पराभव झाल्याचे आठवले यांनी सांगितले.  

दरम्यान दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले.