शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

Delhi Election Results : 'आप'च्या विजयानंतर रामदास आठवलेही म्हणाले, 'लगे रहो केजरीवाल' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:43 IST

दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे आकडे समोर येत असून, पुन्हा आम आदमी पार्टीचं सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पक्षाच्या शानदार विजयानंतर अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यात आरपीआयचे नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचाही समावेश झाला आहे.

नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आठवले यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहे. आठवले म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येथील सातच्या सात जागा जिंकल्या होत्या. मात्र केजरीवाल यांनी दिल्लीत वीज मोफत, पाणी मोफत, बस मोफत, मेट्रो मोफत दिली. सगळ मोफत-मोफत दिल्यामुळे दिल्लीकरांनी ठरवले की, दिल्लीसाठी केजरीवाल आणि केंद्र सरकारसाठी मोदीजी. भाजपने प्रयत्न केला. मात्र मुस्लिमांची मते भाजपला मिळाली नाही. त्यामुळे त्यांना सत्ता मिळविण्यात अपयश आल्याचे आठवलेंनी नमूद केले. 

भारतीय जनता पक्षाने काही प्रमाणात भाषा चुकीची वापरली. त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र मुस्लीम मते मिळाली नसल्याने भाजपचा पराभव झाल्याचे आठवले यांनी सांगितले.  

दरम्यान दिल्लीतील पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. त्याचवेळी भाजपने गेल्यावेळच्या तुलनेत प्रगती केली आहे. केजरीवाल यांना शुभेच्छा. आणखी चांगेल काम करावे, असं सांगत आठवले यांनी 'लगे रहो केजरीवाल' म्हटले.