शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:51 IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले.

Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर यश  मिळवता आलं. या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल,  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारत लोकांसाठी काम करत राहू असं म्हटलं. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला. त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. यावेळी राज्यपालांनी तुम्ही यमुनेच्या शापामुळे हरलात असं विधान केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी व्हीके सक्सेना यांनी यमुनेच्या प्रदूषणावरुन आतिशी यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला यमुना मातेने शाप दिला आहे. यमुना स्वच्छ करण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलायला हवी होती, असं व्हीके सक्सेना यांनी म्हटलं. आतिशी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान एलजी सक्सेना यांनी वायू प्रदूषणाबाबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचाही उल्लेख केला. राज्यपाल सचिवालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रचनात्मक पावले उचलण्यासाठी अनेक पत्रे लिहिली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुम्हाला यमुना मातेचा शाप आहे. तुम्ही लोकांनी यमुना स्वच्छ करायला हवी होती. त्यासाठी पावले उचलायला हवी होती. आमच्या सचिवालयाने अनेक उपायसुद्धा सुचवले होते, असं नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणाले. या विधानावर आतिशी किंवा आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

२७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडले होते. पक्षाने आतिशी यांना नवे मुख्यमंत्री केले होते.  निवडणुकीतील पराभवानंतर आतिशी यांनी रविवारी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल