शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्हाला यमुनेने शाप दिला"; राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना नायब राज्यपालांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:51 IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आतिशी यांना यमुनेच्या प्रदूषणावरुन नायब राज्यपालांनी चांगलेच सुनावले.

Delhi Election Results: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागांवर यश  मिळवता आलं. या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल,  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारत लोकांसाठी काम करत राहू असं म्हटलं. दुसरीकडे आपच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विजय मिळवला आहे. आतिशी यांनी भाजपच्या रमेश बिधुरींचा पराभव केला. त्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. यावेळी राज्यपालांनी तुम्ही यमुनेच्या शापामुळे हरलात असं विधान केलं.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी व्हीके सक्सेना यांनी यमुनेच्या प्रदूषणावरुन आतिशी यांना चांगलेच सुनावले. तुम्हाला यमुना मातेने शाप दिला आहे. यमुना स्वच्छ करण्यासाठी सरकारने सक्रिय पावले उचलायला हवी होती, असं व्हीके सक्सेना यांनी म्हटलं. आतिशी यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान एलजी सक्सेना यांनी वायू प्रदूषणाबाबत झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचाही उल्लेख केला. राज्यपाल सचिवालयाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रचनात्मक पावले उचलण्यासाठी अनेक पत्रे लिहिली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तुम्हाला यमुना मातेचा शाप आहे. तुम्ही लोकांनी यमुना स्वच्छ करायला हवी होती. त्यासाठी पावले उचलायला हवी होती. आमच्या सचिवालयाने अनेक उपायसुद्धा सुचवले होते, असं नायब राज्यपाल व्हीके सक्सेना म्हणाले. या विधानावर आतिशी किंवा आम आदमी पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

२७ जानेवारी रोजी एका प्रचार सभेत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाकडून दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू इच्छित आहे. हरियाणातून पाठवण्यात येणाऱ्या पाण्यात विष मिसळले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सप्टेंबर २०२४ मध्ये पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीपद सोडले होते. पक्षाने आतिशी यांना नवे मुख्यमंत्री केले होते.  निवडणुकीतील पराभवानंतर आतिशी यांनी रविवारी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल