शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Delhi Election Result: निकालापूर्वीच 'या' काँग्रेस उमेदवारानं स्वीकारला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:11 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे.

ठळक मुद्दे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही.विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत.मतमोजणीच्या हाती आलेल्या कलानुसार विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे. त्यांनी ट्विट करत मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांप्रति आभार व्यक्त केला आहे. मुकेश शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. मी माझा पराभव स्वीकारतो, विकासपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मला आशा आहे की, क्षेत्राचा चारही बाजूंनी विकास होणार आहे. मी भविष्यात दिल्ली, विकासपुरी आणि उत्तम नगर विधानसभा क्षेत्राच्या चतुर्भुज विकासासाठी लढाई लढत राहीन. भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.

हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक