शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Delhi Election Results: केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:03 IST

Delhi Assembly Election Results Updates: विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाच्या नेत्यांकडून केजरीवालांवर पातळी सोडून टीका

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि तब्बल २०० खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्यानं दिल्ली विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. मात्र आपच्या झंझावातासमोर ही निवडणूक कमालीची एकतर्फी झाली. सध्या भाजपाचे ३४ उमेदवार विजयी झाले असून २९ उमेदवार आघाडीवर आहेत. आपनं २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे.भाजपाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांवर जहरी टीका केली. मात्र दिल्लीकरांनी नकारात्मक राजकारण नाकारलं. शाहीन बागेत सुरू असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलनावरुन भाजपा नेत्यांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली. या सर्वच नेत्यांना जनतेनं नाकारलं. 

केजरीवालांना दहशतवादी म्हणणाऱ्या कपिल मिश्रांचा दारुण पराभव२०१५ ची विधानसभा निवडणुकीत कपिल मिश्रांनी आपच्या तिकीटावर लढवली. त्यांच्याकडे जल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र केजरीवालांवर टीका करत त्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होताच त्यांनी केजरीवालांना दहशतवादी म्हटलं. केजरीवालांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या मिश्रा यांना जनतेनं स्पष्टपणे नाकारलं. आपच्या अखिलेश पति त्रिपाठी यांनी त्यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव केला.  

शाहीन बागेवरुन राजकारण करणं परवेश वर्मांना महागातलोकसभेत पश्चिम दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी प्रचारादरम्यान आप आणि केजरीवालांवर तोंडसुख घेतलं. शाहीन बाग, बिर्यानी, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा शब्दांचा वर्मा यांनी प्रचारादरम्यान वापर केला. वर्मा यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा येतात. त्या सर्वच्या सर्व १० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला. 
तेजिंदर सिंह बग्गांना जनतेनं नाकारलंहरी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपानं तेजिंदर सिंग बग्गा यांना उमेदवारी दिली होती. फायर ब्रँड नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात बग्गा यांनी अनेकदा केजरीवालांना लक्ष्य केलं. गेल्या पाच वर्षांपासून ते ट्विटरवरही आक्रमक होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते जाहीरपणे केजरीवालांना दहशतवादी म्हणत होते. आपच्या उमेदवार राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा १७ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा