शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

Delhi Election Results: केजरीवालांना दहशतवादी म्हणणं महागात पडलं; जाणून घ्या 'त्या' तिघांच्या मतदारसंघात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:03 IST

Delhi Assembly Election Results Updates: विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाच्या नेत्यांकडून केजरीवालांवर पातळी सोडून टीका

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि तब्बल २०० खासदार दिल्लीत तळ ठोकून असल्यानं दिल्ली विधानसभा निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज होता. मात्र आपच्या झंझावातासमोर ही निवडणूक कमालीची एकतर्फी झाली. सध्या भाजपाचे ३४ उमेदवार विजयी झाले असून २९ उमेदवार आघाडीवर आहेत. आपनं २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे.भाजपाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवालांवर जहरी टीका केली. मात्र दिल्लीकरांनी नकारात्मक राजकारण नाकारलं. शाहीन बागेत सुरू असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलनावरुन भाजपा नेत्यांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली. या सर्वच नेत्यांना जनतेनं नाकारलं. 

केजरीवालांना दहशतवादी म्हणणाऱ्या कपिल मिश्रांचा दारुण पराभव२०१५ ची विधानसभा निवडणुकीत कपिल मिश्रांनी आपच्या तिकीटावर लढवली. त्यांच्याकडे जल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र केजरीवालांवर टीका करत त्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होताच त्यांनी केजरीवालांना दहशतवादी म्हटलं. केजरीवालांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या मिश्रा यांना जनतेनं स्पष्टपणे नाकारलं. आपच्या अखिलेश पति त्रिपाठी यांनी त्यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव केला.  

शाहीन बागेवरुन राजकारण करणं परवेश वर्मांना महागातलोकसभेत पश्चिम दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी प्रचारादरम्यान आप आणि केजरीवालांवर तोंडसुख घेतलं. शाहीन बाग, बिर्यानी, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा शब्दांचा वर्मा यांनी प्रचारादरम्यान वापर केला. वर्मा यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा येतात. त्या सर्वच्या सर्व १० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला. 
तेजिंदर सिंह बग्गांना जनतेनं नाकारलंहरी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपानं तेजिंदर सिंग बग्गा यांना उमेदवारी दिली होती. फायर ब्रँड नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात बग्गा यांनी अनेकदा केजरीवालांना लक्ष्य केलं. गेल्या पाच वर्षांपासून ते ट्विटरवरही आक्रमक होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते जाहीरपणे केजरीवालांना दहशतवादी म्हणत होते. आपच्या उमेदवार राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा १७ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा