शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:29 IST

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःचा पक्ष (काँग्रेस) वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर आपण देश वाचवण्यासाठी लढत आहोत. असे आम आदमी रक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, सीलमपूर भागात काँग्रेसच्या एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर, काही वेळातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली.

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी, आपचे संयोजक देखील पंतप्रधानांप्रमाणेच प्रचार आणि खोटी आश्वासने देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोहोंनाही वाटते की, मागास, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यकांना भागिदारी मिळू नये. यामुळेच ते जातवार जनगणनेसंदर्भात गप्प आहेत. 

राहुल गांधींनी करून दिली शीला दीक्षित यांच्या शासन काळाची आठवण - अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले, "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. आम्ही घराबाहेर पडू शकत नाही, अत्यंत प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?" असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

आप आणि काँग्रेसचे संबंध बिघडले -दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A. मधील आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नव्हती. तेव्हापासूनच या दोन्ही पक्षांचे संबंध बिघडलेले आहेत. तत्पूर्वी, या दोन्ही पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीमध्ये एकत्रितपणे लढवली होती. तथापि, आता दोन्ही पक्ष ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी