शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:29 IST

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःचा पक्ष (काँग्रेस) वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर आपण देश वाचवण्यासाठी लढत आहोत. असे आम आदमी रक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, सीलमपूर भागात काँग्रेसच्या एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर, काही वेळातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली.

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी, आपचे संयोजक देखील पंतप्रधानांप्रमाणेच प्रचार आणि खोटी आश्वासने देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोहोंनाही वाटते की, मागास, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यकांना भागिदारी मिळू नये. यामुळेच ते जातवार जनगणनेसंदर्भात गप्प आहेत. 

राहुल गांधींनी करून दिली शीला दीक्षित यांच्या शासन काळाची आठवण - अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले, "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. आम्ही घराबाहेर पडू शकत नाही, अत्यंत प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?" असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

आप आणि काँग्रेसचे संबंध बिघडले -दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A. मधील आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नव्हती. तेव्हापासूनच या दोन्ही पक्षांचे संबंध बिघडलेले आहेत. तत्पूर्वी, या दोन्ही पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीमध्ये एकत्रितपणे लढवली होती. तथापि, आता दोन्ही पक्ष ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी