शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Delhi Election 2020: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये थोडी घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:35 IST

२००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्रत्येक विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येत २००८ नंतर थोडीफार का होईना घट झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षातच गेल्या तीन निवडणुकीत गंभीर, अतिगंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार होते. मात्र आम आदमी पक्षाच्या उदयानंतर स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना प्रमुख पक्षांना प्राधान्य द्यावे लागले.

एडीआर इलेक्शन वॉच संस्थेचे ही पाहणी केली आहे. २००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २००८ साली दिल्लीत ७९६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १११ उमेदवारांवारांंविरोधात गुन्हयंची नोंद होती. पुढच्या (२०१३) निवडणुकीत हा आकडा १२९ होता. मात्र २०१५ साली गुन्हेगारी उमेदवारांची संख्या होती ११४. अर्थात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येची एकूण सरासरी वाढलेल दिसते.

२००८ साली काँग्रेसच्या ६७ उमेदवारांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती. त्या खालोखाल भाजप ६३, बसप ६४, जदयू ११, सप ३१, लोजप ३७, राष्ट्रवादी काँग्रेस १५ उमेदवारांनी विविध प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती. २०१३ साली मात्र अण्णा हजारे यांचे आंदोलन व आम आदमी पक्षाचा उदय झाल्याने भाजपने रणनिती बदलली. या निवडणुकीत भाजपच्या ३१ उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. काँग्रेस १५, बसप १४ , जदयू ८ तर आपच्या ५ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती.

केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसनेदेखील उमेदवारी देताना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारास प्राधान्य दिले. २०१५ साली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या लक्षणीय घटली. भाजप २७, काँग्रेस २१ तर बसपच्या १२ उमेदवारांनी तशी माहिती निवडणूक आयोगास दिली होती. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली