शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2020: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये थोडी घट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 05:35 IST

२००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली : प्रत्येक विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येत २००८ नंतर थोडीफार का होईना घट झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षातच गेल्या तीन निवडणुकीत गंभीर, अतिगंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक उमेदवार होते. मात्र आम आदमी पक्षाच्या उदयानंतर स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना प्रमुख पक्षांना प्राधान्य द्यावे लागले.

एडीआर इलेक्शन वॉच संस्थेचे ही पाहणी केली आहे. २००८ ते २०१५ दरम्यान उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. २००८ साली दिल्लीत ७९६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १११ उमेदवारांवारांंविरोधात गुन्हयंची नोंद होती. पुढच्या (२०१३) निवडणुकीत हा आकडा १२९ होता. मात्र २०१५ साली गुन्हेगारी उमेदवारांची संख्या होती ११४. अर्थात दरवर्षी उमेदवारांची संख्या वाढल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या संख्येची एकूण सरासरी वाढलेल दिसते.

२००८ साली काँग्रेसच्या ६७ उमेदवारांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती. त्या खालोखाल भाजप ६३, बसप ६४, जदयू ११, सप ३१, लोजप ३७, राष्ट्रवादी काँग्रेस १५ उमेदवारांनी विविध प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली होती. २०१३ साली मात्र अण्णा हजारे यांचे आंदोलन व आम आदमी पक्षाचा उदय झाल्याने भाजपने रणनिती बदलली. या निवडणुकीत भाजपच्या ३१ उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. काँग्रेस १५, बसप १४ , जदयू ८ तर आपच्या ५ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती.

केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसनेदेखील उमेदवारी देताना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारास प्राधान्य दिले. २०१५ साली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संख्या लक्षणीय घटली. भाजप २७, काँग्रेस २१ तर बसपच्या १२ उमेदवारांनी तशी माहिती निवडणूक आयोगास दिली होती. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली