शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:13 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घोटाळ्याच्या संदर्भात हजर राहण्यासाठी त्यांना आता चौथ्यांदा समन्स पाठवला जाऊ शकतो. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. हे समन्स बेकायदेशीर असल्याचा केजरीवालांचा आरोप फेटाळून लावत ईडी त्यांना नव्याने समन्स पाठवू शकते असं सूत्रांनी सांगितलं.

समन्सवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. ईडीला अद्याप पुरावे मिळालेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून मद्य घोटाळ्याची चर्चा असून तपास यंत्रणेने अनेक छापे टाकले आहेत. केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, तपास यंत्रणेने खोट्या प्रकरणात अनेक आप नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आता भाजपाला त्यालाही चौकशीच्या निमित्ताने अटक करायची आहे. 

"खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला"

'आप'चा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला घातला जात आहे. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, या प्रकरणी मी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, पण उत्तर मिळाले नाही. याचा सरळ अर्थ तपास यंत्रणेकडे मद्य घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहे. 

"चौकशीच्या बहाण्याने अटक करायचीय"

बेकायदेशीर समन्सचे पालन का करायचे? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि तपास यंत्रणेचा हेतू या प्रकरणात कोणताही तपास करणे नसून त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करायची आहे. यामुळे आपचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे, त्यामुळेच निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, तर दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयने त्यांना आठ महिन्यांपूर्वी बोलावले होते आणि त्यांनी सीबीआयमध्ये जाऊन त्यांची सर्व उत्तरे दिली होती.

"भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो"

केजरीवाल म्हणाले की, आज भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पकडत नाही, तर ईडी आणि सीबीआयचा वापर करून इतर पक्षांचे नेते फोडून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ईडी किंवा सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणाऱ्या आणि गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकरणे भाजपामध्ये सामील होताच बंद करण्यात आली आहेत किंवा थांबवण्यात आली आहेत. भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तुरुंगात आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर त्यांनी भाजपामध्ये येण्यास नकार दिला म्हणून असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा