शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:13 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घोटाळ्याच्या संदर्भात हजर राहण्यासाठी त्यांना आता चौथ्यांदा समन्स पाठवला जाऊ शकतो. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. हे समन्स बेकायदेशीर असल्याचा केजरीवालांचा आरोप फेटाळून लावत ईडी त्यांना नव्याने समन्स पाठवू शकते असं सूत्रांनी सांगितलं.

समन्सवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. ईडीला अद्याप पुरावे मिळालेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून मद्य घोटाळ्याची चर्चा असून तपास यंत्रणेने अनेक छापे टाकले आहेत. केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, तपास यंत्रणेने खोट्या प्रकरणात अनेक आप नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आता भाजपाला त्यालाही चौकशीच्या निमित्ताने अटक करायची आहे. 

"खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला"

'आप'चा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला घातला जात आहे. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, या प्रकरणी मी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, पण उत्तर मिळाले नाही. याचा सरळ अर्थ तपास यंत्रणेकडे मद्य घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहे. 

"चौकशीच्या बहाण्याने अटक करायचीय"

बेकायदेशीर समन्सचे पालन का करायचे? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि तपास यंत्रणेचा हेतू या प्रकरणात कोणताही तपास करणे नसून त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करायची आहे. यामुळे आपचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे, त्यामुळेच निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, तर दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयने त्यांना आठ महिन्यांपूर्वी बोलावले होते आणि त्यांनी सीबीआयमध्ये जाऊन त्यांची सर्व उत्तरे दिली होती.

"भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो"

केजरीवाल म्हणाले की, आज भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पकडत नाही, तर ईडी आणि सीबीआयचा वापर करून इतर पक्षांचे नेते फोडून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ईडी किंवा सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणाऱ्या आणि गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकरणे भाजपामध्ये सामील होताच बंद करण्यात आली आहेत किंवा थांबवण्यात आली आहेत. भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तुरुंगात आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर त्यांनी भाजपामध्ये येण्यास नकार दिला म्हणून असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा