शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:13 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घोटाळ्याच्या संदर्भात हजर राहण्यासाठी त्यांना आता चौथ्यांदा समन्स पाठवला जाऊ शकतो. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. हे समन्स बेकायदेशीर असल्याचा केजरीवालांचा आरोप फेटाळून लावत ईडी त्यांना नव्याने समन्स पाठवू शकते असं सूत्रांनी सांगितलं.

समन्सवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. ईडीला अद्याप पुरावे मिळालेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून मद्य घोटाळ्याची चर्चा असून तपास यंत्रणेने अनेक छापे टाकले आहेत. केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, तपास यंत्रणेने खोट्या प्रकरणात अनेक आप नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आता भाजपाला त्यालाही चौकशीच्या निमित्ताने अटक करायची आहे. 

"खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला"

'आप'चा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला घातला जात आहे. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, या प्रकरणी मी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, पण उत्तर मिळाले नाही. याचा सरळ अर्थ तपास यंत्रणेकडे मद्य घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहे. 

"चौकशीच्या बहाण्याने अटक करायचीय"

बेकायदेशीर समन्सचे पालन का करायचे? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि तपास यंत्रणेचा हेतू या प्रकरणात कोणताही तपास करणे नसून त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करायची आहे. यामुळे आपचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे, त्यामुळेच निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, तर दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयने त्यांना आठ महिन्यांपूर्वी बोलावले होते आणि त्यांनी सीबीआयमध्ये जाऊन त्यांची सर्व उत्तरे दिली होती.

"भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो"

केजरीवाल म्हणाले की, आज भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पकडत नाही, तर ईडी आणि सीबीआयचा वापर करून इतर पक्षांचे नेते फोडून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ईडी किंवा सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणाऱ्या आणि गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकरणे भाजपामध्ये सामील होताच बंद करण्यात आली आहेत किंवा थांबवण्यात आली आहेत. भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तुरुंगात आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर त्यांनी भाजपामध्ये येण्यास नकार दिला म्हणून असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा