शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अडचणी वाढणार, ईडी चौथ्यांदा समन्स पाठवणार?; आप-भाजपामध्ये संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 08:13 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घोटाळ्याच्या संदर्भात हजर राहण्यासाठी त्यांना आता चौथ्यांदा समन्स पाठवला जाऊ शकतो. केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. हे समन्स बेकायदेशीर असल्याचा केजरीवालांचा आरोप फेटाळून लावत ईडी त्यांना नव्याने समन्स पाठवू शकते असं सूत्रांनी सांगितलं.

समन्सवरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे. ईडीला अद्याप पुरावे मिळालेले नाहीत, तर गेल्या दोन वर्षांपासून मद्य घोटाळ्याची चर्चा असून तपास यंत्रणेने अनेक छापे टाकले आहेत. केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, तपास यंत्रणेने खोट्या प्रकरणात अनेक आप नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. आता भाजपाला त्यालाही चौकशीच्या निमित्ताने अटक करायची आहे. 

"खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला"

'आप'चा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबवणे हा त्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी संपत्ती प्रामाणिकपणा आहे. खोटे आरोप आणि बनावट समन्स पाठवून प्रामाणिकपणावर घाला घातला जात आहे. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगून ते म्हणाले की, या प्रकरणी मी ईडीला काही प्रश्न विचारले आहेत, पण उत्तर मिळाले नाही. याचा सरळ अर्थ तपास यंत्रणेकडे मद्य घोटाळ्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. एजन्सीचे समन्स बेकायदेशीर आहे. 

"चौकशीच्या बहाण्याने अटक करायचीय"

बेकायदेशीर समन्सचे पालन का करायचे? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीरदृष्ट्या योग्य समन्स आल्यास पूर्ण सहकार्य करू, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, भाजपा आणि तपास यंत्रणेचा हेतू या प्रकरणात कोणताही तपास करणे नसून त्यांना चौकशीच्या बहाण्याने अटक करायची आहे. यामुळे आपचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे, त्यामुळेच निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत, तर दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू आहे. सीबीआयने त्यांना आठ महिन्यांपूर्वी बोलावले होते आणि त्यांनी सीबीआयमध्ये जाऊन त्यांची सर्व उत्तरे दिली होती.

"भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो"

केजरीवाल म्हणाले की, आज भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना पकडत नाही, तर ईडी आणि सीबीआयचा वापर करून इतर पक्षांचे नेते फोडून त्यांना भाजपामध्ये सामील करून घेत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, ईडी किंवा सीबीआयच्या तपासाला सामोरे जाणाऱ्या आणि गंभीर आरोपांना सामोरे जाणाऱ्या नेत्यांची सर्व प्रकरणे भाजपामध्ये सामील होताच बंद करण्यात आली आहेत किंवा थांबवण्यात आली आहेत. भाजपामध्ये न येणारा नेता तुरुंगात जातो. मनीष सिसोदिया, संजय सिंह हे तुरुंगात आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून नाही तर त्यांनी भाजपामध्ये येण्यास नकार दिला म्हणून असंही केजरीवालांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा