शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:47 IST

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. मात्र या सगळ्यात दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटाच्या बातम्याही समोर येत आहेत. कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीसह १२ राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारनं राजधानीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मेट्रो ट्रेन आणि रुग्णालयांसह सर्व महत्त्वाच्या संस्थांना वीजपुरवठा करण्यात अडचण येऊ शकते.

दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी या परिस्थितीबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. यासोबतच सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून वीज केंद्राला कोळसा उपलब्ध करून त्यांच्याकडून दिल्लीला वीजपुरवठा करता येईल.

दिल्लीतील दादरी पॉवर प्लांटमधून सर्वाधिक वीजदादरी, उंचाहर, कहलगाव, फरक्का आणि झज्जर पॉवर प्लांटमधून दररोज 1,751 मेगावॅट वीज दिल्लीला पुरवली जाते. दिल्लीला सर्वाधिक पुरवठा (728 MW) दादरी-II पॉवर प्लांटमधून केला जातो. त्याचबरोबर उंचाहार येथून 100 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. नॅशनल पॉवर पोर्टलच्या डेली कोल रिपोर्टनुसार, या सर्व पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा आहे.

"दादरी-II आणि उंचाहर पॉवर स्टेशनमधून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, दिल्ली मेट्रो आणि सरकारी रुग्णालयांसह अनेक अत्यावश्यक संस्थांना 24 तास वीज पुरवठ्यात समस्या निर्माण होऊ शकते", असं दिल्ली सरकारनं जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. 

टॅग्स :electricityवीजdelhiदिल्ली