शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 10:47 IST

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. मात्र या सगळ्यात दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटाच्या बातम्याही समोर येत आहेत. कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीसह १२ राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारनं राजधानीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मेट्रो ट्रेन आणि रुग्णालयांसह सर्व महत्त्वाच्या संस्थांना वीजपुरवठा करण्यात अडचण येऊ शकते.

दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी या परिस्थितीबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. यासोबतच सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून वीज केंद्राला कोळसा उपलब्ध करून त्यांच्याकडून दिल्लीला वीजपुरवठा करता येईल.

दिल्लीतील दादरी पॉवर प्लांटमधून सर्वाधिक वीजदादरी, उंचाहर, कहलगाव, फरक्का आणि झज्जर पॉवर प्लांटमधून दररोज 1,751 मेगावॅट वीज दिल्लीला पुरवली जाते. दिल्लीला सर्वाधिक पुरवठा (728 MW) दादरी-II पॉवर प्लांटमधून केला जातो. त्याचबरोबर उंचाहार येथून 100 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. नॅशनल पॉवर पोर्टलच्या डेली कोल रिपोर्टनुसार, या सर्व पॉवर प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा आहे.

"दादरी-II आणि उंचाहर पॉवर स्टेशनमधून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, दिल्ली मेट्रो आणि सरकारी रुग्णालयांसह अनेक अत्यावश्यक संस्थांना 24 तास वीज पुरवठ्यात समस्या निर्माण होऊ शकते", असं दिल्ली सरकारनं जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. 

टॅग्स :electricityवीजdelhiदिल्ली