शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

'त्या' सगळ्या डॉक्टरांना भारतरत्न द्या; अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 23:35 IST

कोरोना संकटात रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात देशातील जनतेची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी पत्र लिहिलं. कोरोनाशी दोन हात करताना आपला जीव गमावणाऱ्यांसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असंदेखील केजरीवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

'कोरोना संकटाशी मुकाबला करताना अनेक डॉक्टर आणि नर्सेसनी जीव गमावला. आपण भारतरत्न पुरस्कारानं त्यांचा सन्मान केल्यास ती त्यांच्यासाठी अतिशय योग्य श्रद्धांजली असेल. लाखो डॉक्टर आणि नर्सेसनी त्यांचं आयुष्य आणि कुटुंबाची चिंता न करता निस्वार्थ भावनेनं लोकांची सेवा केली. भारतरत्नच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान होईल,' असं केजरीवाल यांनी पत्रात म्हटलं आहे.

वैद्यकीय क्षेत्राला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं असल्यास त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करावे लागतील. ते करण्यात यावेत, अशीही मागणी केजरीवालांनी केली आहे. 'एका समूहाला भारतरत्न देण्याचा नियम नसल्यास नियमांमध्ये बदल करण्यात यावेत. संपूर्ण देशाच्या मनात डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. डॉक्टरांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव झाल्यास देशातील प्रत्येक नागरिकाला आनंद होईल,' अशा भावना केजरीवालांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्या