शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'त्या' सगळ्या डॉक्टरांना भारतरत्न द्या; अरविंद केजरीवालांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 23:35 IST

कोरोना संकटात रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात देशातील जनतेची सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतरत्न देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी पत्र लिहिलं. कोरोनाशी दोन हात करताना आपला जीव गमावणाऱ्यांसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असंदेखील केजरीवाल यांनी पत्रात नमूद केलं आहे.

'कोरोना संकटाशी मुकाबला करताना अनेक डॉक्टर आणि नर्सेसनी जीव गमावला. आपण भारतरत्न पुरस्कारानं त्यांचा सन्मान केल्यास ती त्यांच्यासाठी अतिशय योग्य श्रद्धांजली असेल. लाखो डॉक्टर आणि नर्सेसनी त्यांचं आयुष्य आणि कुटुंबाची चिंता न करता निस्वार्थ भावनेनं लोकांची सेवा केली. भारतरत्नच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान होईल,' असं केजरीवाल यांनी पत्रात म्हटलं आहे.

वैद्यकीय क्षेत्राला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करायचं असल्यास त्यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करावे लागतील. ते करण्यात यावेत, अशीही मागणी केजरीवालांनी केली आहे. 'एका समूहाला भारतरत्न देण्याचा नियम नसल्यास नियमांमध्ये बदल करण्यात यावेत. संपूर्ण देशाच्या मनात डॉक्टरांबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. डॉक्टरांचा भारतरत्न पुरस्कारानं गौरव झाल्यास देशातील प्रत्येक नागरिकाला आनंद होईल,' अशा भावना केजरीवालांनी पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्या