शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, केजरीवालांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 15:38 IST

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

ठळक मुद्देदिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, याबाबतचे वृत्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फेटाळून लावत दिल्लीत लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. 

याआधी 18 जूनपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात येईल, असा दावा केला जात होता. यावर रविवारी पीआयबीकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पीआयबीने ट्विटमध्ये म्हटले की, "ही चुकीची बातमी आहे. अशा कोणत्याही योजनेचा विचार केला जात नाही. अफवांपासून सावध राहा."

दुसरीकडे, दिल्लीत कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. या बैठकीत भाजपा, आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि दिल्लीचे बसपाचे अध्यक्ष यांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, अमित शहा यांनी काल अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. यानंतर अमित शहा यांनी सायंकाळी पाच वाजता महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कोरोनाबद्दल चर्चा केली. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 2224 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 56 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनाची रुग्णांची संख्या 41182 वर पोहचली आहेत, तर आतापर्यंत 1327 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे सरकारसाठी आव्हान आहे. 

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 11 हजार 502 नवे रुग्ण आढळले. तर 325 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे  भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल 9 हजार 520 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या....

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक       

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली