शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:14 IST

Delhi CM Arvind Kejriwal News: अंतरिम जामिनाची मुदत का वाढवून मागितली, यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Delhi CM Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. ०२ जून रोजी अरविंद केजरीवाल यांची जामिनाची मुदत संपणार असून, जामीन मुदत वाढवून मिळावी, यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा, रॅली यांचा धडाका लावला असून, सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या जामीन मुदत वाढीच्या याचिकेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली. या टीकेला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांची तर मनापासूनची इच्छा आहे की, केजरीवालने मरुन जावे. सातत्याने वजन कमी होत आहे. हा गंभीर आजाराचा धोका असू शकतो. ७ किलोहून जास्त वजन कमी झाले आहे. विनाकारण कमी झालेले वजन गंभीर आजारांसाठी धोक्याची घंटा आहे. सीरिअस प्रॉब्लेम होऊ शकतो, यासाठी सर्वोच्च न्यालालयात याचिका दाखल करून अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मागितली आहे. डॉक्टरांनी अनेक तपासण्या लिहून दिल्या आहेत. त्या करण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. त्या आठवड्यात सर्व तपासण्या करून घेईन. त्यामुळे काही गंभीर आजार नाही ना, याची खात्री करून घेता येईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

पंजाब सरकार पाडण्याची अमित शाह यांची धमकी

अमित शाह यांनी पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली असून, ही हुकुमशाही असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. तुम्ही अमित शाह यांचे भाषण ऐकले का, एकाबाजूला त्यांनी पंजाबी लोकांना अपशब्द बोलले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ०४ जूननंतर पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली आहे. तसेच भगवंत मान मुख्यमंत्री म्हणून राहणार नाहीत, असेही सांगितले आहे. आमच्याकडे ९२ जागा आहेत. तुम्ही सरकार कसे पाडू शकता, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी