शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:14 IST

Delhi CM Arvind Kejriwal News: अंतरिम जामिनाची मुदत का वाढवून मागितली, यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Delhi CM Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. ०२ जून रोजी अरविंद केजरीवाल यांची जामिनाची मुदत संपणार असून, जामीन मुदत वाढवून मिळावी, यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा, रॅली यांचा धडाका लावला असून, सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या जामीन मुदत वाढीच्या याचिकेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली. या टीकेला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांची तर मनापासूनची इच्छा आहे की, केजरीवालने मरुन जावे. सातत्याने वजन कमी होत आहे. हा गंभीर आजाराचा धोका असू शकतो. ७ किलोहून जास्त वजन कमी झाले आहे. विनाकारण कमी झालेले वजन गंभीर आजारांसाठी धोक्याची घंटा आहे. सीरिअस प्रॉब्लेम होऊ शकतो, यासाठी सर्वोच्च न्यालालयात याचिका दाखल करून अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मागितली आहे. डॉक्टरांनी अनेक तपासण्या लिहून दिल्या आहेत. त्या करण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. त्या आठवड्यात सर्व तपासण्या करून घेईन. त्यामुळे काही गंभीर आजार नाही ना, याची खात्री करून घेता येईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

पंजाब सरकार पाडण्याची अमित शाह यांची धमकी

अमित शाह यांनी पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली असून, ही हुकुमशाही असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. तुम्ही अमित शाह यांचे भाषण ऐकले का, एकाबाजूला त्यांनी पंजाबी लोकांना अपशब्द बोलले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ०४ जूननंतर पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली आहे. तसेच भगवंत मान मुख्यमंत्री म्हणून राहणार नाहीत, असेही सांगितले आहे. आमच्याकडे ९२ जागा आहेत. तुम्ही सरकार कसे पाडू शकता, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी