शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:14 IST

Delhi CM Arvind Kejriwal News: अंतरिम जामिनाची मुदत का वाढवून मागितली, यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Delhi CM Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. ०२ जून रोजी अरविंद केजरीवाल यांची जामिनाची मुदत संपणार असून, जामीन मुदत वाढवून मिळावी, यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रचारसभा, रॅली यांचा धडाका लावला असून, सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या जामीन मुदत वाढीच्या याचिकेवरून भाजपा नेत्यांनी टीका केली. या टीकेला केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांची तर मनापासूनची इच्छा आहे की, केजरीवालने मरुन जावे. सातत्याने वजन कमी होत आहे. हा गंभीर आजाराचा धोका असू शकतो. ७ किलोहून जास्त वजन कमी झाले आहे. विनाकारण कमी झालेले वजन गंभीर आजारांसाठी धोक्याची घंटा आहे. सीरिअस प्रॉब्लेम होऊ शकतो, यासाठी सर्वोच्च न्यालालयात याचिका दाखल करून अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मागितली आहे. डॉक्टरांनी अनेक तपासण्या लिहून दिल्या आहेत. त्या करण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागितली आहे. त्या आठवड्यात सर्व तपासण्या करून घेईन. त्यामुळे काही गंभीर आजार नाही ना, याची खात्री करून घेता येईल, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

पंजाब सरकार पाडण्याची अमित शाह यांची धमकी

अमित शाह यांनी पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली असून, ही हुकुमशाही असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला. तुम्ही अमित शाह यांचे भाषण ऐकले का, एकाबाजूला त्यांनी पंजाबी लोकांना अपशब्द बोलले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ०४ जूननंतर पंजाब सरकार पाडण्याची धमकी दिली आहे. तसेच भगवंत मान मुख्यमंत्री म्हणून राहणार नाहीत, असेही सांगितले आहे. आमच्याकडे ९२ जागा आहेत. तुम्ही सरकार कसे पाडू शकता, अशी विचारणा केजरीवाल यांनी केली आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी