शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:02 IST

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

Arvind Kejriwal News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या प्रचारांतून अरविंद केजरीवाल भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्याशी केली असून, पुतिन आणि शेख हसीना यांनी केले, तेच आता मोदी करू पाहात आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.

पाच दिवसीय पंजाब दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल म्हणाले की, पाकिस्तानमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकले. निवडणुका झाल्या आणि खान यांचा पक्ष सत्तेबाहेर झाला. बांगलादेशात शेख हसीना यांनी सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आणि निवडणुका जिंकल्या. रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही तेच केले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले

एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तुम्हा सर्वांना देश वाचवण्याचे आवाहन करायचे आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले. आमचे नेते संजय सिंह, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही खोट्या खटल्यांखाली तुरुंगात टाकले आहे. आमच्या चार मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मोदीजी म्हणाले की, चला आता निवडणूक लढवू. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले, पक्षांची चिन्हे हिसकावून घेतली आणि म्हणाले की, चला निवडणूक लढू, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

दरम्यान, ते देवापेक्षा मोठे आहेत का? देवाने त्याचे विश्व निर्माण केले आणि आपल्याला या ग्रहावर आणले. पण त्यांच्या मते तो विश्वाचा निर्माता आहे आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांचा अहंकार मोडायला हवा. ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर आरक्षण संपवतील. त्यामुळे तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, भगवंत मानांचे हात बळकट करा. जेणेकरून संसदेत आमचा आवाज उठवता येईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी