शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:02 IST

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

Arvind Kejriwal News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या प्रचारांतून अरविंद केजरीवाल भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्याशी केली असून, पुतिन आणि शेख हसीना यांनी केले, तेच आता मोदी करू पाहात आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.

पाच दिवसीय पंजाब दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल म्हणाले की, पाकिस्तानमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकले. निवडणुका झाल्या आणि खान यांचा पक्ष सत्तेबाहेर झाला. बांगलादेशात शेख हसीना यांनी सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आणि निवडणुका जिंकल्या. रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही तेच केले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले

एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तुम्हा सर्वांना देश वाचवण्याचे आवाहन करायचे आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले. आमचे नेते संजय सिंह, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही खोट्या खटल्यांखाली तुरुंगात टाकले आहे. आमच्या चार मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मोदीजी म्हणाले की, चला आता निवडणूक लढवू. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले, पक्षांची चिन्हे हिसकावून घेतली आणि म्हणाले की, चला निवडणूक लढू, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

दरम्यान, ते देवापेक्षा मोठे आहेत का? देवाने त्याचे विश्व निर्माण केले आणि आपल्याला या ग्रहावर आणले. पण त्यांच्या मते तो विश्वाचा निर्माता आहे आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांचा अहंकार मोडायला हवा. ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर आरक्षण संपवतील. त्यामुळे तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, भगवंत मानांचे हात बळकट करा. जेणेकरून संसदेत आमचा आवाज उठवता येईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी