शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:02 IST

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

Arvind Kejriwal News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम जामिनावर बाहेर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. या प्रचारांतून अरविंद केजरीवाल भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्याशी केली असून, पुतिन आणि शेख हसीना यांनी केले, तेच आता मोदी करू पाहात आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला.

पाच दिवसीय पंजाब दौऱ्यावर असलेले अरविंद केजरीवाल म्हणाले की, पाकिस्तानमध्ये इम्रान खानला तुरुंगात टाकले. निवडणुका झाल्या आणि खान यांचा पक्ष सत्तेबाहेर झाला. बांगलादेशात शेख हसीना यांनी सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आणि निवडणुका जिंकल्या. रशियात व्लादिमीर पुतिन यांनीही तेच केले आणि प्रचंड बहुमताने विजयी झाले. नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर देशाची लोकशाही आपण वाचवू शकणार नाही. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, असा मोठा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले

एक वेळ उपाशी राहू शकतो, पण हुकूमशाही सहन करणार नाही. इथे माझ्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आलो आहे. देश वाचवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तुम्हा सर्वांना देश वाचवण्याचे आवाहन करायचे आहे. लोकसभेची आचारसंहिता लागू झाली आणि मला तुरुंगात टाकले. आमचे नेते संजय सिंह, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही खोट्या खटल्यांखाली तुरुंगात टाकले आहे. आमच्या चार मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकल्यानंतर मोदीजी म्हणाले की, चला आता निवडणूक लढवू. मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन तुकडे केले, पक्षांची चिन्हे हिसकावून घेतली आणि म्हणाले की, चला निवडणूक लढू, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

दरम्यान, ते देवापेक्षा मोठे आहेत का? देवाने त्याचे विश्व निर्माण केले आणि आपल्याला या ग्रहावर आणले. पण त्यांच्या मते तो विश्वाचा निर्माता आहे आणि देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यांचा अहंकार मोडायला हवा. ते तिसऱ्यांदा सत्तेत आले तर आरक्षण संपवतील. त्यामुळे तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, भगवंत मानांचे हात बळकट करा. जेणेकरून संसदेत आमचा आवाज उठवता येईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी