शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

"6300 कोटीत MLA खरेदी करतात आणि म्हणतात भ्रष्टाचाराशी लढतोय", केजरीवालांचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:17 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मित्रांचे 10 लाख कोटी खाल्ले, 6300 कोटींना आमदार विकत घेतले आणि लाल किल्ल्यावर उभा राहून म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय.'

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मित्रांचे 10 लाख कोटी खाल्ले, 6300 कोटींना आमदार विकत घेतले आणि लाल किल्ल्यावर उभा राहून म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय.'

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या विश्वासदर्शक ठरावामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस आम आदमी पक्षाने अपयशी ठरवले आहे. सोमवारी दिल्ली विधानसभेत सभागृहाचे कामकाज गदारोळात सुरू झाले. भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सभापतींनी त्यांना मार्शल आऊट केले. 

भाजपच्या कर धोरणावर हल्लाबोल करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "आज संपूर्ण देश महागाईच्या प्रभावाने त्रस्त आहे. केंद्र सरकारने दूध, दही, लस्सी, ताक, गहू, तांदूळ आणि मीठ यावरही कर लावला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात कोणत्याही सरकारने इतका कर लावला नाही. सरकार तर सोडा, इंग्रजांनीही इतका कर लावला नव्हता. देशातील अनेक घरांमध्ये आता एक वेळ भाजी घेणे कमी झाले आहे. दूध घेणे बंद केले आहे."

देशातील प्रत्येक गोष्टीवर कर लावून मिळणारी अब्जावधी आणि ट्रिलियन कमाई ते कुठे खर्च करत आहेत? हा पैसा जातो कुठे? त्याचे काही कोट्यधीश मित्र आहेत, ज्यांनी बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यानंतर त्याच्या मित्रांचा हेतू चुकला आणि ते कर्ज त्यांना जमा करायचे नाही. त्याला त्याच्या मित्रांचे कर्ज माफ झाले आहे. तेही 10 लाख कोटी रुपये, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्याबाबत दिल्लीत विश्वासदर्शक ठरावादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले, "ते नौटंकी करत होते, दारूमध्ये पैसे खाल्ले. आम्ही 10 वेळा विचारले की, छाप्यात काय सापडले? काही बाहेर आले नाही. आता आजपासून आदेश आला आहे : आता दारूवर बोलायचे नाही. आता विचारा नवीन वर्गखोल्या का बांधल्या? शौचालये का बांधली? हो, बांधल्या..काय चुकीचे केले?"

याचबरोबर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपवर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांची सरकारे पाडल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत ते झारखंडचे सरकार पाडणार आहेत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी त्यांनी 6300 कोटी खर्च केले. हा पैसा कुठून आला? महागडे डिझेल आणि पेट्रोल खरेदी घेऊन आम्ही सर्वांनी हे पैसे दिले. आता जेव्हा जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील तेव्हा तुम्हाला समजेल की कोणत्या ना कोणत्या राज्यातील सरकार पडणार आहे, त्यामुळेच आमदारांची खरेदी-विक्री करता, यावी म्हणून पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली