शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:07 IST

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News: गेल्या ७५ वर्षांत अन्य पक्षांना जमले नाही, ते आम आदमी पार्टीने करून दाखवले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News ( Marathi News ): गेल्या १० वर्षांत १३५० राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आला. आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष काढला. जर आपण त्या १३५० राजकीय पक्षांप्रमाणे यशस्वी झालो नसतो आणि काही चांगले केले नसते तर आज आपल्या पक्षाचा एकही नेता तुरुंगात गेला नसता. आज प्रत्येकाच्या घरात आणि कुटुंबात आनंद साजरा होत असता. मात्र, जनतेचा हिताचा, लोककल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग त्यासाठी तुरुंगात जावेच लागेल, असे विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक परिषद झाली. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची वाटचाल सांगताना विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी केलेल्या प्रदीर्घ संबोधनात केजरीवाल म्हणाले की, दोन मोठ्या पक्षांनी या देशावर ७५ वर्षे राज्य केले आहे, ते इतक्या सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. आपल्याला संघर्ष करत राहायचा आहे. आपल्याला दुःखी होण्याची गरज नाही. तुरुंगात असलेले आमचे पाच नेते हिरो आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. वकिलांच्या सतत संपर्कात आहे. तुरुंगात राहणारे आमचे सर्व नेते खचलेले नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांचा जामीन रद्द करण्यात आला, त्याच दिवशी सिसोदिया यांनी एक संदेश पाठवला. त्यात, जेवढा काळ तुरुंगात ठेवतील, त्याला काही अडचण नाही. हे संपूर्ण प्रकरण खोटे असून माझा लढा सुरूच राहणार आहे.

गेल्या १२ वर्षांत आम आदमी पक्षाने करून दाखवले

आम आदमी पक्षाने गेल्या १२ वर्षात अभूतपूर्व यश मिळवले. जे काम इतर पक्ष ७५ वर्षांतही करू शकले नाहीत, ते काम आम्ही केले आहे. पक्षाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे. देशात प्रथमच शाळा-हॉस्पिटलच्या प्रश्नांवर बोलणे विरोधकांना भाग पडले आहे. या लोकांनी आमचा गॅरंटी हा शब्द जाहीरनामासह चोरला आहे. आता हे लोकही “मोदींची गॅरंटी” आणि “काँग्रेसची गॅरंटी” म्हणू लागले आहेत. या लोकांनी जनतेला आश्वासने दिली, पण त्यांची पूर्तता कोणीही केली नाही. कारण त्यांचा हेतू चांगला नाही. आम्ही आमच्या सर्व आश्वासनांची पूर्तता करीत आहोत. मुलांना चांगले शिक्षण आणि गरिबांना मोफत उपचार देण्याचे बोलले तर तुरुंगात जावे लागेल आणि त्यासाठी आम्हाला तयार राहावे लागेल, असे सूतोवाच अरविंद केजरीवाल यांनी केले.

दरम्यान, देशभरात संघटना वाढवणे आणि मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. मजबूत संघटनेशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष संघटना बांधण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या राज्यात कठोर परिश्रम करावे लागतील. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा एक भाग आहे. जागावाटपामध्ये ज्या काही जागा मिळाल्या, त्या निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवायच्या आहेत. त्या सर्व जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक लढवत नाही, त्या राज्यांतील पक्षाचे स्वयंसेवक येऊन जिथे निवडणूक लढवतील तिथे मदत करतील. लोकसभेनंतर हरियाणा विधानसभा निवडणूक आपल्या पक्षासाछी सर्वांत मोठी निवडणूक आहे. आम आदमी पार्टी हरियाणा विधानसभा निवडणूक सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने लढणार असून, त्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी