शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

“आता जनकल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग तुरुंगात तर जावेच लागेल”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:07 IST

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News: गेल्या ७५ वर्षांत अन्य पक्षांना जमले नाही, ते आम आदमी पार्टीने करून दाखवले, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

AAP Chief Delhi CM Arvind Kejriwal News ( Marathi News ): गेल्या १० वर्षांत १३५० राजकीय पक्षांमध्ये आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आला. आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष काढला. जर आपण त्या १३५० राजकीय पक्षांप्रमाणे यशस्वी झालो नसतो आणि काही चांगले केले नसते तर आज आपल्या पक्षाचा एकही नेता तुरुंगात गेला नसता. आज प्रत्येकाच्या घरात आणि कुटुंबात आनंद साजरा होत असता. मात्र, जनतेचा हिताचा, लोककल्याणाचा मार्ग निवडला आहे, मग त्यासाठी तुरुंगात जावेच लागेल, असे विधान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक परिषद झाली. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पक्षाची वाटचाल सांगताना विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी केलेल्या प्रदीर्घ संबोधनात केजरीवाल म्हणाले की, दोन मोठ्या पक्षांनी या देशावर ७५ वर्षे राज्य केले आहे, ते इतक्या सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत. आपल्याला संघर्ष करत राहायचा आहे. आपल्याला दुःखी होण्याची गरज नाही. तुरुंगात असलेले आमचे पाच नेते हिरो आहेत. आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे. वकिलांच्या सतत संपर्कात आहे. तुरुंगात राहणारे आमचे सर्व नेते खचलेले नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्या दिवशी मनीष सिसोदिया यांचा जामीन रद्द करण्यात आला, त्याच दिवशी सिसोदिया यांनी एक संदेश पाठवला. त्यात, जेवढा काळ तुरुंगात ठेवतील, त्याला काही अडचण नाही. हे संपूर्ण प्रकरण खोटे असून माझा लढा सुरूच राहणार आहे.

गेल्या १२ वर्षांत आम आदमी पक्षाने करून दाखवले

आम आदमी पक्षाने गेल्या १२ वर्षात अभूतपूर्व यश मिळवले. जे काम इतर पक्ष ७५ वर्षांतही करू शकले नाहीत, ते काम आम्ही केले आहे. पक्षाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली आहे. देशात प्रथमच शाळा-हॉस्पिटलच्या प्रश्नांवर बोलणे विरोधकांना भाग पडले आहे. या लोकांनी आमचा गॅरंटी हा शब्द जाहीरनामासह चोरला आहे. आता हे लोकही “मोदींची गॅरंटी” आणि “काँग्रेसची गॅरंटी” म्हणू लागले आहेत. या लोकांनी जनतेला आश्वासने दिली, पण त्यांची पूर्तता कोणीही केली नाही. कारण त्यांचा हेतू चांगला नाही. आम्ही आमच्या सर्व आश्वासनांची पूर्तता करीत आहोत. मुलांना चांगले शिक्षण आणि गरिबांना मोफत उपचार देण्याचे बोलले तर तुरुंगात जावे लागेल आणि त्यासाठी आम्हाला तयार राहावे लागेल, असे सूतोवाच अरविंद केजरीवाल यांनी केले.

दरम्यान, देशभरात संघटना वाढवणे आणि मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. मजबूत संघटनेशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत. पक्ष संघटना बांधण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या राज्यात कठोर परिश्रम करावे लागतील. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा एक भाग आहे. जागावाटपामध्ये ज्या काही जागा मिळाल्या, त्या निवडणुका चांगल्या पद्धतीने लढवायच्या आहेत. त्या सर्व जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचा आहे. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक लढवत नाही, त्या राज्यांतील पक्षाचे स्वयंसेवक येऊन जिथे निवडणूक लढवतील तिथे मदत करतील. लोकसभेनंतर हरियाणा विधानसभा निवडणूक आपल्या पक्षासाछी सर्वांत मोठी निवडणूक आहे. आम आदमी पार्टी हरियाणा विधानसभा निवडणूक सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने लढणार असून, त्यासाठी सर्व ताकद पणाला लावू, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी