शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आजपासून २०० युनिट्स वीज मोफत; विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:27 IST

दर महिन्याला २०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्यांना बिल नाही

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. दिल्लीकरांना दर महिन्याला २०० युनिट्स वीज मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचा विजेचा वापर २०० युनिट्सपेक्षा कमी आहे, त्यांना बिल भरावं लागणार नाही. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महिन्याकाठी २०० युनिट्सपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना वीज बिल द्यावं लागणार नाही, अशी घोषणा केजरीवालांनी केली. मात्र २०० युनिट्सचा टप्पा ओलांडताच बिल द्यावं लागेल. त्यातही २०१ ते ४०० युनिट्स दरम्यान वीज वापरणाऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येईल, असं केजरीवालांनी सांगितलं. आधीची सरकारं वीज बिलात वाढ करायची. मात्र आम्ही ग्राहकांना दिलासा देत आहोत, असा दावा त्यांनी केला. केजरीवालांच्या घोषणेनंतर ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. विजेचा वापर २०० युनिट्सपेक्षा वाढल्यास बिल कसं आकारलं जाणार, असा प्रश्न ग्राहकांना पडला. एखाद्या कुटुंबानं महिन्याला ३०० युनिट्स विजेचा वापर केला. तर २०० युनिट्सनंतरच्या पुढील १०० युनिट्सवर निम्मं बिल आकारण्यात येणार की संपूर्ण ३०० युनिट्सवर निम्मं बिल घेतलं जाणार, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला. अशा परिस्थितीत सरकार २०१५ मधील नियमाचा आधार घेईल. या नियमानुसार २०० युनिट्सपेक्षा अधिक वापर केल्यास संपूर्ण बिलाची निम्मी रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल. याचा अर्थ ३०० युनिट्सचा वापर केल्यास १५० युनिट्सचं बिल द्यावं लागेल.  

टॅग्स :electricityवीजArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप