शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“AAPला संपवण्याचे षडयंत्र, पुरावे नसताना FIR केल्या जातायत”; अरविंद केजरीवालांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:34 IST

AAP Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.

AAP Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी आम आदमी पक्षाला संपवण्याचे षडयंत्र करत आहेत. आमच्या आमदारांवर खोट्या FIR दाखल केल्या जात आहेत. खोट्या केसेसमध्ये अडकवून अटक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच सर्व कागदपत्रे, फाइल्स तपासण्यात आल्या. एकाही पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोन वर्षांपासून आमचे ज्येष्ठ नेते अटकेत आहेत. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात ईडीकडे कोणताही पुरावा नाही. आमच्या नेत्यांविरोधात खोटे तपास सुरू आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. 

पंतप्रधान मोदींनी देशाचे वातावरण बिघडवून टाकले आहे

पंतप्रधान मोदी वाणीत आणि कृतीतून अहंकार दिसून येतो. पंतप्रधान मोदी देशाचे वातावरण बिघडवत आहेत. प्रत्येक जण आता त्यांना घाबरायला लागला आहे. मनीष सिसोदिया प्रकरणी न्यायालयाने वारंवार पुराव्याची मागणी केली. मात्र, मनीष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावे देता आले नाहीत. याचाच अर्थ सर्व केसेस खोट्या आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर १७० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पैकी १४० प्रकरणातील निर्णय आमच्या बाजूने लागलेले आहेत. आधी संजय सिंह यांना अटक केली आणि आता अमानतुल्ला खान यांच्या घरी छापेमारी केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी