शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

“AAPला संपवण्याचे षडयंत्र, पुरावे नसताना FIR केल्या जातायत”; अरविंद केजरीवालांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:34 IST

AAP Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.

AAP Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी आम आदमी पक्षाला संपवण्याचे षडयंत्र करत आहेत. आमच्या आमदारांवर खोट्या FIR दाखल केल्या जात आहेत. खोट्या केसेसमध्ये अडकवून अटक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच सर्व कागदपत्रे, फाइल्स तपासण्यात आल्या. एकाही पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोन वर्षांपासून आमचे ज्येष्ठ नेते अटकेत आहेत. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात ईडीकडे कोणताही पुरावा नाही. आमच्या नेत्यांविरोधात खोटे तपास सुरू आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. 

पंतप्रधान मोदींनी देशाचे वातावरण बिघडवून टाकले आहे

पंतप्रधान मोदी वाणीत आणि कृतीतून अहंकार दिसून येतो. पंतप्रधान मोदी देशाचे वातावरण बिघडवत आहेत. प्रत्येक जण आता त्यांना घाबरायला लागला आहे. मनीष सिसोदिया प्रकरणी न्यायालयाने वारंवार पुराव्याची मागणी केली. मात्र, मनीष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावे देता आले नाहीत. याचाच अर्थ सर्व केसेस खोट्या आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर १७० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पैकी १४० प्रकरणातील निर्णय आमच्या बाजूने लागलेले आहेत. आधी संजय सिंह यांना अटक केली आणि आता अमानतुल्ला खान यांच्या घरी छापेमारी केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी