शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

“AAPला संपवण्याचे षडयंत्र, पुरावे नसताना FIR केल्या जातायत”; अरविंद केजरीवालांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:34 IST

AAP Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर सुरू असलेल्या कारवाईवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली.

AAP Arvind Kejriwal: गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

मनीष सिसोदिया यांच्याविरोधात कोणतेच पुरावे सापडलेले नाहीत. भाजप आणि पंतप्रधान मोदी आम आदमी पक्षाला संपवण्याचे षडयंत्र करत आहेत. आमच्या आमदारांवर खोट्या FIR दाखल केल्या जात आहेत. खोट्या केसेसमध्ये अडकवून अटक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच सर्व कागदपत्रे, फाइल्स तपासण्यात आल्या. एकाही पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही. दोन वर्षांपासून आमचे ज्येष्ठ नेते अटकेत आहेत. मनीष सिसोदिया यांच्याविरोधात ईडीकडे कोणताही पुरावा नाही. आमच्या नेत्यांविरोधात खोटे तपास सुरू आहे, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. 

पंतप्रधान मोदींनी देशाचे वातावरण बिघडवून टाकले आहे

पंतप्रधान मोदी वाणीत आणि कृतीतून अहंकार दिसून येतो. पंतप्रधान मोदी देशाचे वातावरण बिघडवत आहेत. प्रत्येक जण आता त्यांना घाबरायला लागला आहे. मनीष सिसोदिया प्रकरणी न्यायालयाने वारंवार पुराव्याची मागणी केली. मात्र, मनीष सिसोदिया यांच्याविरोधात पुरावे देता आले नाहीत. याचाच अर्थ सर्व केसेस खोट्या आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर १७० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पैकी १४० प्रकरणातील निर्णय आमच्या बाजूने लागलेले आहेत. आधी संजय सिंह यांना अटक केली आणि आता अमानतुल्ला खान यांच्या घरी छापेमारी केली, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी