शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मतदान झाल्यावर लगेच ठरला दिल्लीचा मुख्यमंत्री; रेखा गुप्ता यांचे नाव प्रथमपासूनच आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 10:28 IST

भाजपने हा विचार पक्का केला. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांत विजय मिळाल्यास महिला नेत्याला मुख्यमंत्री करायचे असा निर्णय भाजपने ५ फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच घेतला. महिला सबलीकरणासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे कृतीतून दाखविणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यानुसार भाजपने हा विचार पक्का केला. त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रिपदी निवड करावी, असा निर्णय एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला भाजप आमदार, तसेच भाजप नेते रविशंकर प्रसाद, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन राज्य सरकार स्थापनेचा दावा केला. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर भाजप नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर होते. या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरदेखील त्यांच्याच नावाला प्राधान्य देण्यात येत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, गुप्ता यांच्या नावाबद्दल मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रवेश वर्मा, सतीश उपाध्याय, विजेंद्र गुप्ता या भाजप नेत्यांशी पक्षाच्या निरीक्षकांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांची मते विचारात घेऊन गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आले.

प्रवेश वर्मा यांनीच सुचविले रेखा गुप्ता यांचे नाव

मंत्रिमंडळात जाट, शीख, मागासवर्गीय, पूर्वांचली गट या साऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्याचे भाजपने ठरविले आहे. विधिमंडळ नेतेपदासाठी रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या प्रवेश वर्मा यांनीच सुचविले.

त्याला सतीश उपाध्याय, वीजेंद्र गुप्ता या भाजप नेत्यांनी अनुमोदन दिले.  निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ११ दिवसांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव भाजपने जाहीर केले.