शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दिल्लीच्या विधानसभेतही CAA विरोधात ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 10:28 IST

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुद्धा सुरु आहे. तर केरळ, पंजाब, राजस्थान, बिहार,कर्नाटक, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल नंतर आता दिल्लीच्या विधानसभेतही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते.

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सीएए, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहेत असे भाजप म्हणत आहे. परंतु आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं, केजरीवाल म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 20 जून 2019 रोजी म्हणाले होते की, एनआरसी लागू होणार असून, आमच्या सरकारचा असा निर्णय झाला आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा 10 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की देशात एनआरसी लागू होणार आहे. मात्र आता सरकार म्हणत आहे की, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहे. परंतु तुमच्या सागण्यावरून हे खर होत नाही. तर आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं सुद्धा केजरीवाल म्हणाले.

देशातील अनेक भागात अजूनही एनपीआर, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. तसेच अनेक राज्यांनी विधानसभेत ह्या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत. त्यात आता दिल्लीच्या विधानसभेची सुद्धा भर पडली आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे.