शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दिल्लीच्या विधानसभेतही CAA विरोधात ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 10:28 IST

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुद्धा सुरु आहे. तर केरळ, पंजाब, राजस्थान, बिहार,कर्नाटक, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल नंतर आता दिल्लीच्या विधानसभेतही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते.

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सीएए, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहेत असे भाजप म्हणत आहे. परंतु आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं, केजरीवाल म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 20 जून 2019 रोजी म्हणाले होते की, एनआरसी लागू होणार असून, आमच्या सरकारचा असा निर्णय झाला आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा 10 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की देशात एनआरसी लागू होणार आहे. मात्र आता सरकार म्हणत आहे की, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहे. परंतु तुमच्या सागण्यावरून हे खर होत नाही. तर आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं सुद्धा केजरीवाल म्हणाले.

देशातील अनेक भागात अजूनही एनपीआर, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. तसेच अनेक राज्यांनी विधानसभेत ह्या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत. त्यात आता दिल्लीच्या विधानसभेची सुद्धा भर पडली आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे.