शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या विधानसभेतही CAA विरोधात ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 10:28 IST

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलने सुद्धा सुरु आहे. तर केरळ, पंजाब, राजस्थान, बिहार,कर्नाटक, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल नंतर आता दिल्लीच्या विधानसभेतही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते.

चर्चेदरम्यान एनपीआर आणि एनआरसीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सीएए, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहेत असे भाजप म्हणत आहे. परंतु आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं, केजरीवाल म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 20 जून 2019 रोजी म्हणाले होते की, एनआरसी लागू होणार असून, आमच्या सरकारचा असा निर्णय झाला आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा 10 डिसेंबर रोजी संसदेत सांगितले होते की देशात एनआरसी लागू होणार आहे. मात्र आता सरकार म्हणत आहे की, एनपीआर आणि एनआरसी वेगळे आहे. परंतु तुमच्या सागण्यावरून हे खर होत नाही. तर आसाममध्ये काय घडले याबद्दल देशात चिंता असल्याचं सुद्धा केजरीवाल म्हणाले.

देशातील अनेक भागात अजूनही एनपीआर, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. तसेच अनेक राज्यांनी विधानसभेत ह्या कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत. त्यात आता दिल्लीच्या विधानसभेची सुद्धा भर पडली आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली आहे.