शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:52 IST

विजयाचा भाजपला भरवसा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय मुद्दे आणि चांगल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी अनेक सर्व्हे करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.भाजप अनेक आघाड्यांवर काम करीत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत मिळालेली ५५ टक्के मते पुन्हा मिळवीत पुढल्या वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणूक आरामात जिंकता येईल.अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपच्या पारड्यात पडलेली ५५ टक्के मते विधासभा निवडणुकीत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे भाजपचे संघटन सचिव सिद्धार्थन यांनी सांगितले. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक मुदतीआधी होण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने बैठकांचे सत्र सुरू केले आहे.विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघनिहाय विशेष मुद्दे ठरविणे, भाजप आमदारांसोबत दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या कामगिरीचे आकलन करणे आणि योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नेत्यांच्या लोकप्रियतेचे विश्लेषण करण्यासाठी तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपचा पराभव केला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीपेक्षा भाजपला ६७ मतदारसंघांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. दोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. वेगवेगळ्या वस्त्यांत रात्री मुक्काम करून तेथील लोकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी अनधिकृत झोपडपट्ट्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, असेही त्या नेत्याने सांगितले.निश्चित विजय होण्याची आशादोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपाAAPआप