शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

Arvind Kejriwal : "जर 'आप'चं सरकार आलं तर विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि मेट्रोमध्ये ५०% सूट देऊ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:47 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. जर 'आप'ने सरकार स्थापन केलं तर ते दिल्लीतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देतील. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना ५०% सूट देखील दिली जाईल असं म्हटलं आहे. 

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, "आम्हाला विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुलभ करायची आहे. जर 'आप' निवडणूक जिंकली तर आम्ही दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास मोफत करण्याच्या मॉडेलवर काम करत आहोत. महिला विद्यार्थ्यांना आधीच याचा लाभ मिळत आहे."

"मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याची विनंती केली आहे. दिल्ली मेट्रो ही केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. आम्हाला आशा आहे की, ते या सार्वजनिक कल्याणकारी योजनेला सहमती देतील. केंद्र आणि दिल्ली सरकार विद्यार्थ्यांच्या सवलतींसाठी ५०:५० योगदान देऊ शकतात."

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिल्ली मेट्रोच्या भाड्यात ५० टक्के सब्सिडी देण्याची मागणी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "दिल्लीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये, महाविद्यालयात जाण्यासाठी खूप समस्या येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून आहेत."

केजरीवाल यांनी पुढे लिहिलं की, विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो हा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील ५०:५० सहकार्याचा प्रकल्प आहे. म्हणून यावर होणारा खर्च दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने समान रीतीने करावा.

"आमच्याकडून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची योजना आखत आहोत. मला मनापासून आशा आहे की, तुम्ही या प्रस्तावाशी सहमत व्हाल" असं पत्राच्या शेवटच्या भागात अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीStudentविद्यार्थी