शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Arvind Kejriwal : "जर 'आप'चं सरकार आलं तर विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि मेट्रोमध्ये ५०% सूट देऊ"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:47 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. जर 'आप'ने सरकार स्थापन केलं तर ते दिल्लीतील विद्यार्थ्यांना मोफत बस पास देतील. तसेच दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताना ५०% सूट देखील दिली जाईल असं म्हटलं आहे. 

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, "आम्हाला विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुलभ करायची आहे. जर 'आप' निवडणूक जिंकली तर आम्ही दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास मोफत करण्याच्या मॉडेलवर काम करत आहोत. महिला विद्यार्थ्यांना आधीच याचा लाभ मिळत आहे."

"मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याची विनंती केली आहे. दिल्ली मेट्रो ही केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. आम्हाला आशा आहे की, ते या सार्वजनिक कल्याणकारी योजनेला सहमती देतील. केंद्र आणि दिल्ली सरकार विद्यार्थ्यांच्या सवलतींसाठी ५०:५० योगदान देऊ शकतात."

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिल्ली मेट्रोच्या भाड्यात ५० टक्के सब्सिडी देण्याची मागणी केली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "दिल्लीतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये, महाविद्यालयात जाण्यासाठी खूप समस्या येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मेट्रोवर अवलंबून आहेत."

केजरीवाल यांनी पुढे लिहिलं की, विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवतो. दिल्ली मेट्रो हा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील ५०:५० सहकार्याचा प्रकल्प आहे. म्हणून यावर होणारा खर्च दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारने समान रीतीने करावा.

"आमच्याकडून, आम्ही विद्यार्थ्यांसाठी बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची योजना आखत आहोत. मला मनापासून आशा आहे की, तुम्ही या प्रस्तावाशी सहमत व्हाल" असं पत्राच्या शेवटच्या भागात अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीStudentविद्यार्थी