शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"मी स्वतः वेळ देईन..."; यमुना नदीसाठी काय-काय करणार? PM मोदींनी दिल्लीकरांना अख्खा प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:16 IST

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी द्वारका येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी यमुना नदीच्या दुर्दशेसंदर्भातही चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर आल्यास, आपण स्वतः या मुद्द्यावर लक्ष देऊन, असा शब्दही पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "दिल्लीत पाण्याची कमतरता, घाणेरडे पाणी आणि यमुनेची स्वच्छता ही एक मोठी समस्या बनली आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील नद्या आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहेत. आपला इतिहास, आपली अर्थव्यवस्था आणि आपली संस्कृती, यांनी गेली शतकानुशतके नदीकाठावरच मोठी प्रगती केली. यमुना ही केवळ एक नदी नाही, तर भारताच्या आध्यात्मिक आणि आर्थिक शक्तीचे प्रतीक आहे. मात्र आज, 'आप-दा' पार्टीमुळे ती प्रचंड अडचणीत सापडली आहे." 

मोदी म्हणाले, माझा पक्का विश्वास आहे की, जेथे राजकीय इच्छाशक्ती असते तेथे बदलाचा मार्ग आपोआप निघतो. मला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बराच काळ काम करण्याची संधी मिळाली. साबरमती नदीची दुर्दशा पाहून मी प्रचंड अस्वस्थ होत हतो. मी दृढनिश्चय केला आणि मला साबरमती नदीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली. प्रदूषित आणि मृतप्राय नदीचे पुनरुज्जीवन करून, आम्ही अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर एक जागतिक दर्जाचा रिव्हर फ्रेंट तयार केला आहे. आज साबरमती रिव्हर फ्रंटने अहमदाबाद शहरालाही नवीन जीवन दिले आहे."

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

दिल्लीतील डबल इंजिन भाजप सरकार यासाठी अनेक टप्प्यांवर काम करेल. सर्वप्रथम, आपण यमुनेचे पाणी स्वच्छ करू. दुसरे म्हणजे, आपण यमुनेच्या काठावर एक आधुनिक रिव्हर फ्रंट तयार करू. तिसरे म्हणजे, यमुनेच्या काठावर पर्यटनासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाईल. एवढेच नाही, तर लोकांना प्रवासाची सोय व्हावी म्हणून वॉटर मेट्रोची शक्यताही तपासली जाईल. आपण कल्पना करू शकता. एकदा अशा पद्धतीने नियोजन करून नदिचा विकास झाला, तर आपल्याला एक सुंदर दिल्ली दिसू लागेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण