शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

"मी स्वतः वेळ देईन..."; यमुना नदीसाठी काय-काय करणार? PM मोदींनी दिल्लीकरांना अख्खा प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:16 IST

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी द्वारका येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी यमुना नदीच्या दुर्दशेसंदर्भातही चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर आल्यास, आपण स्वतः या मुद्द्यावर लक्ष देऊन, असा शब्दही पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "दिल्लीत पाण्याची कमतरता, घाणेरडे पाणी आणि यमुनेची स्वच्छता ही एक मोठी समस्या बनली आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील नद्या आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहेत. आपला इतिहास, आपली अर्थव्यवस्था आणि आपली संस्कृती, यांनी गेली शतकानुशतके नदीकाठावरच मोठी प्रगती केली. यमुना ही केवळ एक नदी नाही, तर भारताच्या आध्यात्मिक आणि आर्थिक शक्तीचे प्रतीक आहे. मात्र आज, 'आप-दा' पार्टीमुळे ती प्रचंड अडचणीत सापडली आहे." 

मोदी म्हणाले, माझा पक्का विश्वास आहे की, जेथे राजकीय इच्छाशक्ती असते तेथे बदलाचा मार्ग आपोआप निघतो. मला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बराच काळ काम करण्याची संधी मिळाली. साबरमती नदीची दुर्दशा पाहून मी प्रचंड अस्वस्थ होत हतो. मी दृढनिश्चय केला आणि मला साबरमती नदीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली. प्रदूषित आणि मृतप्राय नदीचे पुनरुज्जीवन करून, आम्ही अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर एक जागतिक दर्जाचा रिव्हर फ्रेंट तयार केला आहे. आज साबरमती रिव्हर फ्रंटने अहमदाबाद शहरालाही नवीन जीवन दिले आहे."

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

दिल्लीतील डबल इंजिन भाजप सरकार यासाठी अनेक टप्प्यांवर काम करेल. सर्वप्रथम, आपण यमुनेचे पाणी स्वच्छ करू. दुसरे म्हणजे, आपण यमुनेच्या काठावर एक आधुनिक रिव्हर फ्रंट तयार करू. तिसरे म्हणजे, यमुनेच्या काठावर पर्यटनासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाईल. एवढेच नाही, तर लोकांना प्रवासाची सोय व्हावी म्हणून वॉटर मेट्रोची शक्यताही तपासली जाईल. आपण कल्पना करू शकता. एकदा अशा पद्धतीने नियोजन करून नदिचा विकास झाला, तर आपल्याला एक सुंदर दिल्ली दिसू लागेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण