शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"मी स्वतः वेळ देईन..."; यमुना नदीसाठी काय-काय करणार? PM मोदींनी दिल्लीकरांना अख्खा प्लॅनच सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 19:16 IST

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी द्वारका येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी यमुना नदीच्या दुर्दशेसंदर्भातही चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर आल्यास, आपण स्वतः या मुद्द्यावर लक्ष देऊन, असा शब्दही पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिला आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "दिल्लीत पाण्याची कमतरता, घाणेरडे पाणी आणि यमुनेची स्वच्छता ही एक मोठी समस्या बनली आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील नद्या आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहेत. आपला इतिहास, आपली अर्थव्यवस्था आणि आपली संस्कृती, यांनी गेली शतकानुशतके नदीकाठावरच मोठी प्रगती केली. यमुना ही केवळ एक नदी नाही, तर भारताच्या आध्यात्मिक आणि आर्थिक शक्तीचे प्रतीक आहे. मात्र आज, 'आप-दा' पार्टीमुळे ती प्रचंड अडचणीत सापडली आहे." 

मोदी म्हणाले, माझा पक्का विश्वास आहे की, जेथे राजकीय इच्छाशक्ती असते तेथे बदलाचा मार्ग आपोआप निघतो. मला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बराच काळ काम करण्याची संधी मिळाली. साबरमती नदीची दुर्दशा पाहून मी प्रचंड अस्वस्थ होत हतो. मी दृढनिश्चय केला आणि मला साबरमती नदीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली. प्रदूषित आणि मृतप्राय नदीचे पुनरुज्जीवन करून, आम्ही अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर एक जागतिक दर्जाचा रिव्हर फ्रेंट तयार केला आहे. आज साबरमती रिव्हर फ्रंटने अहमदाबाद शहरालाही नवीन जीवन दिले आहे."

मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."

दिल्लीतील डबल इंजिन भाजप सरकार यासाठी अनेक टप्प्यांवर काम करेल. सर्वप्रथम, आपण यमुनेचे पाणी स्वच्छ करू. दुसरे म्हणजे, आपण यमुनेच्या काठावर एक आधुनिक रिव्हर फ्रंट तयार करू. तिसरे म्हणजे, यमुनेच्या काठावर पर्यटनासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाईल. एवढेच नाही, तर लोकांना प्रवासाची सोय व्हावी म्हणून वॉटर मेट्रोची शक्यताही तपासली जाईल. आपण कल्पना करू शकता. एकदा अशा पद्धतीने नियोजन करून नदिचा विकास झाला, तर आपल्याला एक सुंदर दिल्ली दिसू लागेल."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारण