शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:47 IST

CM Devendra Fadnavis: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहिणी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी विचार न करता बोलल्याचा आणि देशाच्या राजधानीतील जनतेला विकासाची खोटी आश्वासने दिल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केजरीवाल हे काय आहेत हे अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवालांवर खोटी आश्वासने देण्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील प्रदूषण संकटाचे कारण हे सरकारची निष्क्रियता असल्याचे म्हटलं. दिल्ली विधानसभा निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार विजेंदर गुप्ता यांच्या समर्थनार्थ उत्तर-पश्चिम रोहिणी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केला.

"दिल्लीची निवडणूक ही लोकांना वाईट प्रशासनापासून मुक्ती देण्यासाठी आहे. केजरीवाल काय आहेत हे तुला जाणून घ्यायचे असेल तर मी महाराष्ट्रातून येतो आणि अण्णा हजारे यांच्यासोबत माझे जवळचे संबंध आहेत. मी आताच त्यांना भेटून येत आलोय. जगातल्या सगळ्यात बेईमान माणूस कोणी असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत असं मी नाही तर अण्णा हजारे म्हणतात," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

ऑलिम्पिकमध्ये भ्रष्टाचार करण्याची शर्यत झाली तर केजरीवाल सुवर्णपदक जिंकले असते. दिल्लीचा जलद विकास व्हावा यासाठी त्यांनी मतदारांना दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन करावं लागेल. आप सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे दिल्लीला गटार, गलिच्छ पाणी आणि प्रदूषित हवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. त्यानंतर केजरीवाल आणि अण्णा हजारे वेगळे झाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Kejriwalअरविंद केजरीवालanna hazareअण्णा हजारे