शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:43 IST

Delhi Assembly Election 2024:

मागच्या दोन महिन्यांच्या काळात भाजपाने हरयाणा आणि महाराष्ट्र ही देशातील प्रमुख अशी दोन राज्यं जिंकून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही प्रमाणात भरपाई केली आहे. आता या दोन राज्यांत सत्ता मिळवल्यानंतर भाजपाने मागच्या दहा वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या ताब्यात असलेल्या दिल्लीवर कब्जा करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१३, २०१५ आणि २०२० अशा तीन विधानसभा निवडणुकांत दिल्लीमध्ये विजय मिळवण्यात अपयश आल्यानंतर आता भाजपाने आता केजरीवाल यांना नमवण्यासाठी नव्या ने रणनीती आखली आहे. तसेच २०१३ आणि २०२० मध्ये केलेल्या चुका टाळणार असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपा दिल्ली विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करता लढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या संकेतांनुसार भाजपाचं वरिष्ठ नेतृत्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची यशस्वी रणनीती कायम ठेवण्यावर विश्वास आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विविध राज्यांमधील निवडणुकीत दिसून आला आहे. मागच्या वर्षभरात झालेल्या महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, तेलंगाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली नव्हती. यापैकी पाच राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची घोषणा न करता निवडणूक लढण्याची विविध कारणं होती.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा दृष्टीकोन इतर राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या त्यांच्या रणनीतीला अनुकूल आहे. त्याशिवाय, यामधून पक्षातील अतिरिक्त मतभेद रोखण्यास मदत करेल. तसेच या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार हा व्यक्तिकेंद्रित न होता धोरणात्मक मुद्द्यांवर कायम राहतो. दिल्लीत दहा वर्षांपासून सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष हा अँटी इन्क्मबन्सीचा सामना करत आहे. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत चेहऱ्यांची लढत न घडवून आणता राज्यातील रस्त्यांची स्थिती, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील खर्च आदी मुद्द्यांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भाजपाने २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देवून निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भाजपाने माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले होते. मात्र भाजपाची ही खेळी अपयशी ठरली होती. तसेच पक्षाला ७० पैकी केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर २०१३ मध्ये भाजपाने हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे केलं होतं. त्यावेळी भाजपा ३२ जागांसह मोठा पक्ष ठरला होता. मात्र त्यांना बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा आम आदमी पक्षाने २८ जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तसेच काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाला होते. तर २०२० मध्ये भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित न करता निवडणुकीत उतरला होता. मात्र तेव्हाही भाजपाला केवळ ८ जागा जिंकता आल्या होत्या.  

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल