शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:31 IST

दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या विकासावर नेहमीच चर्चा रंगतात. त्यापाठोपाठ महिलांना मेट्रोचा प्रवास मोफत यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार चांगलेच चर्चेत आले होते. आता आम आदमी पक्षाने दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना आणली आहे. यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी घोषणा केली की, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या फिसची १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थीकडून जेवढी फिस शाळेत दिली जाईल, तेवढीच फिस शिष्यवृत्तीच्या रुपाने परत मिळणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं वर्षीक उत्पन्न एक लाखांपासून अडिच लाख रुपयापर्यंत आहे, त्या विद्यार्थ्यांना शालेय फिसच्या ५० टक्के शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न अडिच लाख ते सहा लाख रुपये आहे, त्या विद्यार्थ्यांना फिसच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे.

दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे.