शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मैतेई-कुकी समाजाला राजनाथ सिंहांचं आवाहन; म्हणाले, "एकत्र बसावं अन् मनापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:36 IST

राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे.

मिझोराम : मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून विविध ठिकाणी हिंसाचार  सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी येथील मैतेई आणि कुकी समाजाला महत्वाचे आवाहन केले आहे. मैतेई आणि कुकी समाजाला एकत्र बसून मनापासून बोलण्याचे आवाहन केले. बुधवारी राजनाथ सिंह यांनी म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण भागात एका रॅलीला संबोधित केले. 

यादरम्यान राजनाथ सिंह यांनी लोकांना सांगितले की, हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही आणि मणिपूरमधील दोन्ही समुदायांनी संकटग्रस्त राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी एकमेकांशी बोलले पाहिजे. गेल्या नऊ वर्षांत ईशान्य भागात शांतता आहे. मात्र, आम्ही मणिपूरमध्ये हिंसाचार पाहिला आहे आणि तो आमच्यासाठी वेदनादायक आहे. याचबरोबर, हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. आपल्याला मनापासून बोलण्याची गरज आहे. मैतेई आणि कुकी समाजाने एकत्र बसावे आणि थेट मनापासून एकमेकांशी संवाद साधावा आणि परस्परांमधील अविश्वासाचे वातावरण संपवावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. गेले काही महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर जवळपास १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले.

१९६६ च्या घटनेचा उल्लेखकेंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने १९६६ मध्ये मिझोराममध्ये हवाई दलाचा वापर केल्याचाही संरक्षणमंत्र्यांनी उल्लेख केला. १९६६ च्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले, "केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी मिझोरामवर देशातील पहिला हवाई हल्ला केला होता. आता भाजप सत्तेत असून आम्ही असे प्रकार कधीच करणार नाही."

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची हत्यामंगळवारी सकाळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सीमाभागातील या शहरात हिंसाचारावर नियंत्रणासाठी मणिपूर पोलिसांच्या कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. या कमांडोंच्या टीमच्या मार्गात स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहManipur Violenceमणिपूर हिंसाचार