शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सीमेवर तणाव असताना मोदी सरकारचा चक्रावून टाकणारा निर्णय; स्थायी समितीकडून चिंता व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:44 IST

चीन आणि पाकिस्तानसोबतचा तणाव कायम असताना मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून सैन्याच्या बजेटाला कात्री लावण्यात आली आहे. सैन्याचं बजेट ६३ हजार कोटी रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबद्दल संरक्षणाशी संबंधित स्थायी समितीनं धोक्याचा इशारा दिला आहे. शेजारी देशांसोबतच तणाव कायम असताना अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नसल्याचं समितीनं सरकारला सांगितलं.

संसदेच्या पटलावर बुधवारी समितीचा अहवाल ठेवण्यात आला. तिन्ही दलांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत त्यांच्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद खूप कमी आहे. संरक्षण मंत्रालयानं येत्या वर्षांमध्ये खर्चात कोणतीही कपात केलेली नाही. २०२२-२३ साठी तिन्ही दलांना २,१५,९९५ कोटी रुपयांची गरज होती. मात्र बजेटमध्ये १,५२,३६९ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली.

बजेटला कात्री लावल्यानं संरक्षण सेवांवर परिणाम होईल, अशी भीती समितीनं व्यक्त केली. तिन्ही दलांनी केलेली मागणी आणि त्यांच्यासाठी करण्यात आलेली तरतूद यामध्ये मोठी तफावत आहे. लष्कराला मागणीपेक्षा १४,७२९ कोटी रुपये कमी मिळाले आहेत. तर नौदलाला २०,०३१ कोटी आणि हवाई दलाला २८,४७१ कोटी रुपये कमी मिळाले आहेत. याचा परिणाम सैन्याच्या आधुनिकीकरणावर होणार आहे.

शेजारी देशांसोबतचे तणावपूर्ण संबंध कायम असताना आपल्या संरक्षण तयारीच्या दृष्टीनं ही परिस्थिती योग्य नाही, असं समितीनं सांगितलं. संरक्षणावरील खर्च कमी करता कामा नये, शिल्लक राहिलेली रक्कम पुढील वर्षी मिळायला हवी, असं स्थायी समितीनं अहवालात नमूद केलं आहे.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल