शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

न्यायालयाचा अवमान करणं, कायदा मोडणं लोकांच्या रक्तात- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:51 IST

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देकायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत

नवी दिल्ली, दि. 31 - सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. कायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. 

मेल टुडेच्या वृत्तानुसार, जस्टिस खेहर यांनी ही टिप्पणी सुनावणीदरम्यान केली होती. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत. दिल्लीच्या लाजपत नगरमधल्या एका इन्स्टिट्यूचे हेड दिनेश खोसला यांनी घराच्या इमारतीचा उपयोग कमर्शियल वापरासाठी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीला विजय माल्यानं केलेल्या न्यायालयाच्या अवमानतेशीही जोडून पाहिलं जात आहे. माल्यानं न्यायालयाच्या आदेशानंतर हजर राहणं पसंद केलं नाही. माल्यानं बँकांचं 9000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं आहे. माल्या सध्या लंडनमध्ये सुरक्षितरीत्या राहतोय. 

मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 24 ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. त्यांनी देशाचे पुढे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांच्या उत्तराधिका-याच्या स्वरूपात न्यायाधीस दीपक मिश्र यांचं नाव प्रस्तावित केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मूलभूत अधिकारांवरूनही सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं होतं. खासगीपणा अधिकार (राइट टू प्रायव्हसी) हा राज्यघटनेंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य करताना त्याच्याशी संबंधित अनेक पैलू मात्र मूलभूत अधिकारात ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली.सर्वोच्च न्यायालयाने १९५० आणि १९६२ मध्ये खासगीपणा हा मूलभूत अधिकार नाही, असा निवाडा दिला होता. खासगीपणा हा मूलभूत अधिकार असू शकेल, परंतु तो अमर्याद वा निरंकुश असू शकत नाही, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नऊ सदस्यीय खंडपीठापुढे म्हटले होते.