शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

न्यायालयाचा अवमान करणं, कायदा मोडणं लोकांच्या रक्तात- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:51 IST

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देकायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत

नवी दिल्ली, दि. 31 - सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. कायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. 

मेल टुडेच्या वृत्तानुसार, जस्टिस खेहर यांनी ही टिप्पणी सुनावणीदरम्यान केली होती. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत. दिल्लीच्या लाजपत नगरमधल्या एका इन्स्टिट्यूचे हेड दिनेश खोसला यांनी घराच्या इमारतीचा उपयोग कमर्शियल वापरासाठी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीला विजय माल्यानं केलेल्या न्यायालयाच्या अवमानतेशीही जोडून पाहिलं जात आहे. माल्यानं न्यायालयाच्या आदेशानंतर हजर राहणं पसंद केलं नाही. माल्यानं बँकांचं 9000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं आहे. माल्या सध्या लंडनमध्ये सुरक्षितरीत्या राहतोय. 

मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 24 ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. त्यांनी देशाचे पुढे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांच्या उत्तराधिका-याच्या स्वरूपात न्यायाधीस दीपक मिश्र यांचं नाव प्रस्तावित केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मूलभूत अधिकारांवरूनही सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं होतं. खासगीपणा अधिकार (राइट टू प्रायव्हसी) हा राज्यघटनेंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य करताना त्याच्याशी संबंधित अनेक पैलू मात्र मूलभूत अधिकारात ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली.सर्वोच्च न्यायालयाने १९५० आणि १९६२ मध्ये खासगीपणा हा मूलभूत अधिकार नाही, असा निवाडा दिला होता. खासगीपणा हा मूलभूत अधिकार असू शकेल, परंतु तो अमर्याद वा निरंकुश असू शकत नाही, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नऊ सदस्यीय खंडपीठापुढे म्हटले होते.