शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे केजरीवालांना मिठाई भरवली; दुसरीकडे मानहानीचा दावा ठोकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:28 IST

या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे भाजपाचे विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा आरोप केला आहे. मंगळवारी गुप्ता यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. केजरीवाल आणि सिसोदियांनी गुप्ता यांच्यावर आप प्रमुखांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते. 

या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे. तक्रारीमध्ये त्यांनी केजरीवाल आणि शिसोदियांवर एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. तसेच खटला लढण्याचा खर्चही मागितला आहे. आप नेत्यांच्या या वक्तव्यामुळे ट्वीटरवर आणि बातम्यांमधून आपल्या प्रतिष्ठेला नुकसान झाले आहे. यावर त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही, असे म्हटले आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी त्यांनी ही वक्तव्ये केली होती. केजरीवालांच्या हत्येचा आरोप करणे वाईट आहे. मुद्दामहून असे आरोप करण्यात आले. हे आरोप आक्षेपार्हच नाहीत तर मानसिक त्रासदायक आणि मानहानीकारक आहेत. केजरीवालांची हत्या करण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना एका आठवड्याच्या आत माफी मागावी असेही म्हटले आहे. 

पटियाला हाऊस न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. कारण त्यांनी कायदेशीर नोटिशीला काहीच उत्तर दिलेले नाही. तसेच दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्य़ात आली आहे. यामध्ये केजरीवाल चुकीच्या पद्धतीने अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप