शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

एकीकडे केजरीवालांना मिठाई भरवली; दुसरीकडे मानहानीचा दावा ठोकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 08:28 IST

या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीचे भाजपाचे विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा आरोप केला आहे. मंगळवारी गुप्ता यांनी न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे. केजरीवाल आणि सिसोदियांनी गुप्ता यांच्यावर आप प्रमुखांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये सहभागी असल्याचे म्हटले होते. 

या प्रकरणावर 6 जूनला सुनावणी होणार असून अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समर विशाल यांच्या समोर हा खटला चालणार आहे. तक्रारीमध्ये त्यांनी केजरीवाल आणि शिसोदियांवर एक कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. तसेच खटला लढण्याचा खर्चही मागितला आहे. आप नेत्यांच्या या वक्तव्यामुळे ट्वीटरवर आणि बातम्यांमधून आपल्या प्रतिष्ठेला नुकसान झाले आहे. यावर त्यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही, असे म्हटले आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये राजकीय फायद्यासाठी त्यांनी ही वक्तव्ये केली होती. केजरीवालांच्या हत्येचा आरोप करणे वाईट आहे. मुद्दामहून असे आरोप करण्यात आले. हे आरोप आक्षेपार्हच नाहीत तर मानसिक त्रासदायक आणि मानहानीकारक आहेत. केजरीवालांची हत्या करण्याचा विचारही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना एका आठवड्याच्या आत माफी मागावी असेही म्हटले आहे. 

पटियाला हाऊस न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. कारण त्यांनी कायदेशीर नोटिशीला काहीच उत्तर दिलेले नाही. तसेच दोघांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल करण्य़ात आली आहे. यामध्ये केजरीवाल चुकीच्या पद्धतीने अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआप