शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळणार अयोध्या, बनणार जागतिक विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 11:31 IST

दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे.

नवी दिल्ली- दिवाळीच्या निमित्तानं अयोध्या आज 5 लाख 51 हजार दिव्यांनी उजळून निघणार आहे. एका विश्वविद्यालयासह विविध महाविद्यालयांतील मुलं रामाचा चौथरा दिव्यांनी झळाळून टाकणार आहेत. मठ आणि मंदिरांना जवळपास दीड लाख दिव्यांनी लखलखीत करण्याची तयारी आहे. व्यापारी आणि सामान्य व्यक्तीही घरापासून शहरांपर्यंत दिव्यांची रोषणाई करणार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचीही टीमसुद्धा अयोध्येत दाखल झाली आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. यावेळी जागोजागी आरएएफ, पीएसी आणि पोलीस, जवान तैनात आहेत. तसेच गुप्तचर विभागाची माणसंही पोहोचली आहेत. एसपी सिटी विजयपाल सिंह यांच्या माहितीनुसार, दुकानदारांना सवलत दिली जाणार आहे. दुकानं नेहमीसारखीच लावण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमामुळे रस्त्याच्या मार्गक्रमणात बदल केलेला असून, जड वाहनांना प्रवेश नाकारला आहे. दुसरीकडे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बिना भटनागर राहणार आहेत.राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामकथा पार्कमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांचं स्वागत करणार आहेत. रामकथा पार्कमध्ये नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्सच्या गटांकडून रामलीलाची महती सांगितली जाणार असून, त्यासाठी लेजर शोच्या माध्यमातून रामकथेचे प्रसंग दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात शनिवारी सकाळी साकेत महाविद्यालयापासून रामकथा पार्कपर्यंत शोधायात्रा काढण्यापासून होणार आहे. संध्याकाळी 7 ते 7.30 वाजता हे दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शरयू मातेची आरती करणार असून, त्यानंतर शरयूच्या किनारी आतषबाजी केली जाणार आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या