शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार", संत परमहंस यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 20:24 IST

Hindurashtra News: काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते.

अयोध्या - अयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. रविवारी तपस्वी छावणीमध्ये सनातन धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संत परमहंस यांनी ही घोषणा केली आहे. १ ऑक्टोबर रोजी देशातील नागरिकांची एक मोठी सनातन धर्मसंसद आयोजित होईल. यामध्ये भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यावर चर्चा होईल. संत परमहंस यांनी सांगितले की, यावर जर केंद्र सरकारने काही निर्णय घेतला नाही तर २ ऑक्टोबर रोजी ते शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतील.

काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते. त्यांनी त्यांची समजूत घालून त्यांना थांबवले होते. दरम्यान, आता संत परमहंस यांनी एक अजून घोषणा केली आहे. जर १ ऑक्टोबरपर्यंत भारताला हिंदूराष्ट्र घोषित केले नाही तर ते २ ऑक्टोबर रोजी शरयू नदीत जलसमाधी घेतील. आता जसजशी २ ऑक्टोबर ही तारीख जवळ येत आहे तसतशा संत परमहंस यांच्या हालचालींना वेग आला आहे.

तपस्वी छावणीचे संत परमहंस दास यांनी सांगितले की, १ ऑक्टोबर रोजी सर्व संघटनांचे लोक हिंदू सनातन धर्मसंसदेचे आयोजन करतील आमि २ ऑक्टोबर रोजी जर आमचे म्हणणे ऐकले गेले नाही तर मी शरयू नदीत जलसमाधी घेईन, मी समाधी घेतल्यानंतर कदाचित माझ्या श्रद्धांजलीमध्ये मोदीजी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करतील, कारण जर हिंदू वाचला नाही तर काहीच वाचणार नाही.

त्यांनी सांगितले ज्याप्रकारे काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावर घोषणा होतात. जर हिंदू राष्ट्र घोषित केले नाही तर हिंदू अल्पसंख्याक होऊन जाईल. त्यापासून वाचण्यासाठी हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. कारण हिंदू तेवढाच उदारमतवादी आहे की हिंदू राष्ट्र घोषित झाल्यावरही दुसऱ्यांना त्रास होणार नाही.  

टॅग्स :Hindutvaहिंदुत्वIndiaभारतAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदी