शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

पदवी परीक्षांचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 05:19 IST

परीक्षा होणार की नाही, या अनिश्चिततेने २७ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्व विद्यापीठांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात केलेल्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्यामुळे परीक्षा होणार की नाही, या अनिश्चिततेने २७ लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.यासंबंधीच्या मूळ यचिका ११ राज्यांमधील ३१ विद्यार्थी तसेच महाराष्ट्राचे मंत्री व भारतीय युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आणि परीक्षा घेण्याच्या विरोधात नंतर इतरही काही विद्यार्थी, शिक्षक संघटना तसेच ओडिशा, प. बंगाल व दिल्ली या राज्यांची सरकारेही त्यात सामील झाली. देशातील कोरोना महामारीचा जोर अद्याप कायम असल्याने परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या जिवास धोकादायक आहे. प्रत्येक राज्यातील सध्याची परिस्थिती विचारात न घेता सर्वांना एकाच फूटपट्टीने मोजून परीक्षांची सक्ती करणे, केवळ अन्यायकारकच नाही तर राज्यांच्या अधिकारांचा संकोच करणारे आहे. त्यामुळे एक तर परीक्षा घेणे किंवा न घेण्याचा निर्णय राज्यांवर सोडावा अथवा अंतिम परीक्षा न घेता आधीच्या वर्षांच्या परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे पदवी दिली जावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.याउलट विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणणे असे की, परीक्षेसह एकूणच शिक्षणाचा दर्जा ठरविण्याचा अधिकार व तो जपण्याचा अधिकार फक्त आयोगास आहे. राज्य सरकारे त्यात लुडबूड करू शकत नाहीत. कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात पदवी हा त्याचे भवितव्य ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असल्याने परीक्षेविना पदवी दिली जाऊ शकत नाही.>रुग्णांत सहापट वाढविद्यापीठ अनुदान आयोगाने हे निर्देश ६ जुलै रोजी दिले त्या दिवसाच्या तुलनेत आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या सहापटीने आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या दुपटीने वाढली आहे, अशा परिस्थितीत न्यायालय आयोगाचे म्हणणे मान्य करते की अमान्य, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.