शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

'व्यापार तोडण्याचा निर्णय खेदजनक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 02:21 IST

हा तर आमचा अंतर्गत प्रश्न; द्विपक्षीय संबंधांवरून भारताची पाकिस्तानवर टीका

नवी दिल्ली : भारताबरोबरचे राजनैतिक संबंध निम्नस्तरीय पातळीवर आणून पाकिस्तान द्विपक्षीय संबंध खूपच वाईट झाल्याचे अनाठायी चित्र जगापुढे मांडू पाहत आहे, अशी टीका भारताने गुरुवारी केली आहे.भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले की, जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. या निर्णयाचे निमित्त करून पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचे तसेच इतर निर्णय जाहीर केले तो खेदजनक प्रकार आहे.भारताने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी उचललेल्या पावलाला पाकिस्तानने नकारात्मक वळण द्यावे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीला पाठबळ देण्यासाठी पाकिस्तान अशा भूमिका नेहमीच घेत आला आहे. भारताची राज्यघटना सार्वभौम असून त्याअंतर्गतच आम्ही काश्मीरबाबत निर्णय घेतला आहे. त्याविरोधात पाकिस्तानने चालविलेला कांगावा कधीही यशस्वी होणार नाही. जम्मू-काश्मीरबाबत भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी त्या देशातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये विकासाच्या आणखी संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार व संसदेने नुकतेच काही निर्णय घेतले आहेत. राज्यघटनेतील काही तात्पुरत्या तरतुदींमुळे त्या राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत होता. तर, काश्मीरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस हे भारत व पाकिस्तानच्या सातत्याने संपर्कात आहेत, असे त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले.काश्मीर निर्णय भारताने मागे घेतल्यास पाकिस्तानही करणार फेरविचारइस्लामाबाद : काश्मीरबाबत नुकताच घेतलेला निर्णय मागे घेण्याची भारताची तयारी असल्यास पाकिस्तानही आपल्या निर्णयांचा फेरविचार करील, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी गुरुवारी म्हटले आहे.काश्मीरबाबत भारताने निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला. भारताबरोबरचे व्यापारी संबंध संपविण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय पाकिस्तानने बुधवारी घेतला. त्याचबरोबर भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना परत पाठविण्यात आले.समझोता एक्स्प्रेस सेवा पाकिस्तानने बंद केली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आता भारताला काश्मीर निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितले आहे. काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश असल्याचे सुरक्षा परिषदेच्या ठरावांत नमूद केले असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मुहम्मद फैसल यांनी म्हटले आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा भारताचा एकतर्फी निर्णय आम्हाला मान्य नाही, असेही ते म्हणाले.व्यापार रद्द केल्याचा फटका पाकिस्तानला जास्त बसणारनवी दिल्ली : भारतासोबतचा द्विपक्षीय व्यापार रद्द केल्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला तरी त्याचा अधिक फटका पाकला बसेल, असे जाणकारांना वाटते. पाकिस्तान भारताकडून कांदे, टोमॅटो आणि रसायने यासारख्या काही अत्यावश्यक वस्तूंची आयात करतो.व्यापार बंद केल्यानंतर ही आयात थांबून पाकिस्तानची कोंडी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम भारताने रद्द केल्यामुळे पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध कमी केले असून, द्विपक्षीय व्यापार निलंबित केला आहे.‘फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशन्स’चे महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले की, भारत पाकिस्तानवर फारसा अवलंबून नाही. पाकिस्तान मात्र भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील व्यापार निलंबित झाल्यास पाकिस्तानला अधिक फटका बसेल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370