शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

अयोध्या वादावर फैसला १७ नोव्हेंबरपूर्वी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:55 IST

मध्यस्थ मंडळाच्या माध्यमातून सहमतीचा तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असतील तर ते तसे करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त २.७७ एकर जमिनीच्या मालकीच्या वादातील अपिलांवर अतिम सुनावणी सुरु असली तरी यातील पक्षकारांना न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ मंडळाच्या माध्यमातून सहमतीचा तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असतील तर ते तसे करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच सर्व पक्षकारांनी १८ आॅक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.ज्या पक्षकारांचा युक्तिवाद बाकी आहे त्यांच्या वकिलांना प्रत्येकाला किती वेळ लागेलयाचे वेळापत्रक देण्यास न्यायालयाने मंगळवारी सांगितले होते. ते बुधवारी सादर केले गेले. ते वाचून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी १८ आॅक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश १७ नोव्हेंबररोजी निवृत्त व्हायचे आहेत.त्याआधी निकाल देणे भाग आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत सुनावणी संपल्यास महिनाभरात निकालपत्र तयार व्हायला अवधी मिळू शकेल. मध्यस्थीतून सकारात्मक निष्पन्न झाल्यास अपिलांऐवजी तडजोडीनुसार निकाल दिला जाऊ शकेल.सरन्यायाधीश यांच्या विशेष खंडपीठाने नमूद केले की, आमच्यासमोर दैनंदिन सुनावणी यापुढेही सुरू राहील. पण मध्यस्थ मंडळाच्या माध्यमामार्फत तोडगा काढण्याची पक्षकारांची इच्छा असल्यास ते तसे करू शकतात. सहमतीने तोडगा निघाला तर तो न्यायालयास कळवावा. मात्र या कामात गोपनीयता पाळावी लागेल.अंतिम सुनावणी सुरू करण्याआधी न्यायालयाने वाद मध्यस्थीने सुटतो हे पाहण्याचे ठरविले व त्यासाठी निवृत्त न्यायाधीश न्या. एफ. एम. आय कलिफुल्ला, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर व ज्येष्ठ वकील श्रीराम पान्चू यांचे मध्यस्थ मंडळ नेमले. या मंडळाने बैठका घेऊन चर्चा केली. पण मध्यस्थीस यश न आल्याचा अहवाल मंडळने दिल्यानंतर न्यायालयाने नियमित सुनावणी सुरू केली.>दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी सुरू राहणारसुमारे महिनाभर सुनावणी झाल्यानंतर सुन्नी वक्फ मंडळ व निर्मोही आखाडा यांनी मध्यस्थ मंडळास पत्र लिहून पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करण्याची इच्छा असल्याचे कळविले. मध्यस्थ मंडळाने त्यावर काय करावे याबाबत निर्देश देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरील स्पष्टिकरण केले.गेल्या वेळी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असताना न्यायालयाने सुनावणी तहकूब ठेवली होती. मात्र आता मध्यस्थीचे प्रयत्न व सुनावणी दोन्ही सुरू राहील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या