शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

दिल्लीतील सत्तास्थापनेवर पाच आठवड्यात निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: August 5, 2014 16:21 IST

दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ५ - दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. दिल्ली विधानसभेत सर्व पक्षीय वादात सर्वसामान्य जनतेने त्रास का सोसावा असा सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. 
दिल्ली विधानसभेसंदर्भात आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधानसभेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश दिले. एका पक्षाला सत्तास्थापनेत रस नाही, दुस-या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, तर एका पक्षामध्ये तेवढी क्षमताच नाही. याचा फटका जनतेने का सोसावा ? दिल्लीत अजून राष्ट्रपती शासन का ? निवडून आलेले आमदार विनाकाम घरी का बसतील ?, केंद्र सरकार कधीपर्यंत दिल्लीतील विधानसभेवर निर्णय घेईल अशा प्रश्नांची सरबत्तीच सुप्रीम कोर्टाने केली.  
दिल्लीत फेब्रुवारीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजपकडे सर्वाधिक आमदार असले तरी सत्ता स्थापनेचे मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना अन्य पक्षातील आमदार आणि अपक्षांची साथ लागणार आहे. काँग्रेसने पुन्हा 'आप'ला समर्थन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीतील नायब राज्यपाल नजीब जंग हे घेणार आहेत.