शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आंदोलन सुरूच राहणार, सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही: मनोज जरांगे
2
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
3
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
4
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
7
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
9
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
10
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
11
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
12
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
13
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
14
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
15
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
16
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
17
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
18
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
19
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
20
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !

दिल्लीतील सत्तास्थापनेवर पाच आठवड्यात निर्णय घ्या - सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: August 5, 2014 16:21 IST

दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ५ - दिल्ली विधानसभेसंदर्भात संबंधित यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. दिल्ली विधानसभेत सर्व पक्षीय वादात सर्वसामान्य जनतेने त्रास का सोसावा असा सवालही सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे. 
दिल्ली विधानसभेसंदर्भात आम आदमी पक्षाने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधानसभेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या यंत्रणांनी पाच आठवड्यांमध्ये निर्णय घ्यावा असे आदेश दिले. एका पक्षाला सत्तास्थापनेत रस नाही, दुस-या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही, तर एका पक्षामध्ये तेवढी क्षमताच नाही. याचा फटका जनतेने का सोसावा ? दिल्लीत अजून राष्ट्रपती शासन का ? निवडून आलेले आमदार विनाकाम घरी का बसतील ?, केंद्र सरकार कधीपर्यंत दिल्लीतील विधानसभेवर निर्णय घेईल अशा प्रश्नांची सरबत्तीच सुप्रीम कोर्टाने केली.  
दिल्लीत फेब्रुवारीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजपकडे सर्वाधिक आमदार असले तरी सत्ता स्थापनेचे मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना अन्य पक्षातील आमदार आणि अपक्षांची साथ लागणार आहे. काँग्रेसने पुन्हा 'आप'ला समर्थन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीतील नायब राज्यपाल नजीब जंग हे घेणार आहेत.