शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

'जे झालं ते पुढे होणार नाही', उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीतील पराभवावर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 21:05 IST

या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे.

नवी दिल्ली-  उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पराभवातून भाजपाला धडा मिळाला आहे. व ते सुधारण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल, असं राजनाथ सिंह यांनी म्हंटलं. 'जे झालं ते पुढे होणार नाही. असंही होऊ शकतं याची आम्हाला कल्पना आली, असं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला.

राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली आहे. राहुल गांधी सरकारवर वारंवार टीका करतात. भारत कुणाच्या विरोधात उभा राहिला आहे, याचं उत्तर फक्त वेळच देईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. राहुल गांधी आमचे विरोधी नेते आहेत त्यामुळे ते बोलतच राहणार. त्यामुळे देश कुणाच्या विरोधात आहे हे वेळच सांगेल. 

दरम्यान, प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती. हा पराभव योगी आदित्यनाथ यांच्या जिव्हारी लागला असून, या निवडणुकीत पक्षाला अतिआत्मविश्वान नडल्याचे म्हटले आहे. मात्र वेळीच ठेच लागली आहे. आता या पराभवातून लवकरात लवकर सावरू आणि २०१९ ची निवडणूक जिंकू, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. 

''आम्ही अतिआत्मविश्वासाने लढलो. त्यामुळेचा आमचा पराभव झाला. निवडणूक असो वा परीक्षा तयारीची एकदा चाचपणी जरूर केली गेली पाहिजे. मात्र या पराभवातून बोध घेऊन भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल."  असं आदित्यनाथ यांनी म्हंटलं होतं. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा