शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:22 IST

शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे.

नवी दिल्ली : आपले सरकार उलथविण्यात आल्यानंतर दि. ५ ऑगस्ट रोजी मी आणि माझी छोटी बहीण शेख रेहाना यांनी बांग्लादेशातून पलायन केले तेव्हा मृत्यू आमच्यापासून अवघा काही मिनिटेच दूर होता, असे प्रतिपादन बांग्लादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे.

शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे. त्यात त्यांनी ही माहिती दिली. हसिना यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही मृत्यूला अवघ्या २० ते २५ मिनिटांच्या अंतराने गुंगारा देऊन बचावलो. २१ ऑगस्टच्या (२००४) बॉम्ब हल्ल्यातून वाचणे किंवा ५ ऑगस्ट २०२४ च्या संकटातून वाचणे यामागे नक्कीच परमेश्वराची कृपा असली पाहिजे. अन्यथा मी वाचूच शकले नसते. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते.’

‘राजकीय विरोधकांनी ठार मारण्याचा कट रचला होता’, असे ७७ वर्षीय हसिना यांनी सांगितले. ५ ऑगस्ट २०२४ पासून त्या भारतात आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर माजलेल्या बंडाळीत हसिना यांचे १६ वर्षांपासून सत्तेवर असलेले बांग्लादेशातील सरकार उलथवून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढून भारतात आश्रय घेतला होता. ‘मी दु:खात आहे. मी माझ्या देशाबाहेर, माझ्या घराबाहेर आहे. सर्वकाही जाळण्यात आले आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश