शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 08:41 IST

विषारू दारू प्रकरणातील ४९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूमुळे सातजणांनी दृष्टी गमावली आहे. सिवान येथील रुग्णालयातून काही जणांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. 

एस. पी. सिन्हा -

पाटणा : बिहारमध्ये दारूविक्रीवर बंदी असली तरी लोकांचे दारू पिणे थांबलेले नाही. त्यातूनच नुकत्याच उद्भवलेल्या विषारी दारूकांडात सिवान, छपरा जिल्ह्यातील १६ गावांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. विषारी दारूमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल त्या राज्याचे दारूबंदी खात्याचे मंत्री रत्नेश सदा यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दारूमाफियांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

विषारू दारू प्रकरणातील ४९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूमुळे सातजणांनी दृष्टी गमावली आहे. सिवान येथील रुग्णालयातून काही जणांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. 

सरकारचा धाक उरला नाही : राहुल गांधी- बिहारमध्ये विषारी दारूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला ही घटना खूपच वेदनादायी आहे. दारूबंदी करूनही बिहारमध्ये अशा घटना घडतात.- याचे कारण अवैधरीत्या दारू बनविणाऱ्या समाजकंटकांना राज्य सरकारचा धाक राहिलेला नाही असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले.- या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी असे गांधी यांनी सांगितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या की, बिहारमध्ये दारूबंदी असूनही अवैध दारूचा व्यापार जोरात आहे. त्यातून दुर्घटना घडत आहेत.  

टॅग्स :Biharबिहारliquor banदारूबंदी