शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीतील एनटीपीसी प्लांट दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला 26 वर, राहुल गांधींनी घेतली जखमींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:00 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीत बुधवारी एक मोठी दुर्घटना झाली. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी)  उंचाहार प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून, 26 पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक लोक दुर्घटनेत जखमी झाले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राहुल गांधींनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील घटनेनंतर शोक व्यक्त केला होता. 

रायबरेलीच्या खासदार असणा-या सोनिया गांधी यांनी आपण पीडित कुटुंबांच्या दुखात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी स्वत: सोनिया गांधींना येण्याची इच्छा होती, मात्र प्रकृती खराब असल्या कारणाने त्या जाऊ शकल्या नाहीत. त्यांच्या खासगी सचिवाने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी दुर्घटनेबद्दल सांगतना सकाळी, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफचं एक पथक बचावकार्याचं काम करत आहे. दुर्घटनेच्या तपासासाठी एक पथक गठीत करण्यात आलं असून, यामध्ये मॅजिस्ट्रेट आणि तांत्रिक अधिका-यांचा समावेश आहे. 

रायबरेलीच्या उंचाहार येथील एनटीपीसी प्लांटमध्ये बॉयरलचा स्फोट झाला होता. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपर्यंत 18 जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जिल्हा रुग्णालयासहित अलाहाबादच्या रुग्णालयात आणि लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामधील अनेकांची स्थिती नाजूक आहे. दुर्घटना झाली तेव्हा जवळपास 150 कामगार प्लांटमध्ये काम करत होते. तसंच त्यावेळी 500 मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश