शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

रायबरेलीतील एनटीपीसी प्लांट दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला 26 वर, राहुल गांधींनी घेतली जखमींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:00 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीत बुधवारी एक मोठी दुर्घटना झाली. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी)  उंचाहार प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून, 26 पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक लोक दुर्घटनेत जखमी झाले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राहुल गांधींनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील घटनेनंतर शोक व्यक्त केला होता. 

रायबरेलीच्या खासदार असणा-या सोनिया गांधी यांनी आपण पीडित कुटुंबांच्या दुखात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी स्वत: सोनिया गांधींना येण्याची इच्छा होती, मात्र प्रकृती खराब असल्या कारणाने त्या जाऊ शकल्या नाहीत. त्यांच्या खासगी सचिवाने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी दुर्घटनेबद्दल सांगतना सकाळी, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफचं एक पथक बचावकार्याचं काम करत आहे. दुर्घटनेच्या तपासासाठी एक पथक गठीत करण्यात आलं असून, यामध्ये मॅजिस्ट्रेट आणि तांत्रिक अधिका-यांचा समावेश आहे. 

रायबरेलीच्या उंचाहार येथील एनटीपीसी प्लांटमध्ये बॉयरलचा स्फोट झाला होता. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपर्यंत 18 जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जिल्हा रुग्णालयासहित अलाहाबादच्या रुग्णालयात आणि लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामधील अनेकांची स्थिती नाजूक आहे. दुर्घटना झाली तेव्हा जवळपास 150 कामगार प्लांटमध्ये काम करत होते. तसंच त्यावेळी 500 मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश