शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीतील एनटीपीसी प्लांट दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला 26 वर, राहुल गांधींनी घेतली जखमींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:00 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीत बुधवारी एक मोठी दुर्घटना झाली. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी)  उंचाहार प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून, 26 पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक लोक दुर्घटनेत जखमी झाले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राहुल गांधींनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील घटनेनंतर शोक व्यक्त केला होता. 

रायबरेलीच्या खासदार असणा-या सोनिया गांधी यांनी आपण पीडित कुटुंबांच्या दुखात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी स्वत: सोनिया गांधींना येण्याची इच्छा होती, मात्र प्रकृती खराब असल्या कारणाने त्या जाऊ शकल्या नाहीत. त्यांच्या खासगी सचिवाने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी दुर्घटनेबद्दल सांगतना सकाळी, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफचं एक पथक बचावकार्याचं काम करत आहे. दुर्घटनेच्या तपासासाठी एक पथक गठीत करण्यात आलं असून, यामध्ये मॅजिस्ट्रेट आणि तांत्रिक अधिका-यांचा समावेश आहे. 

रायबरेलीच्या उंचाहार येथील एनटीपीसी प्लांटमध्ये बॉयरलचा स्फोट झाला होता. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपर्यंत 18 जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जिल्हा रुग्णालयासहित अलाहाबादच्या रुग्णालयात आणि लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामधील अनेकांची स्थिती नाजूक आहे. दुर्घटना झाली तेव्हा जवळपास 150 कामगार प्लांटमध्ये काम करत होते. तसंच त्यावेळी 500 मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश