शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
6
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
7
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
8
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
11
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
12
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
13
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
14
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
16
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
17
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
18
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
19
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
20
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:41 IST

Population Of India: एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात प्रचंड वाढलेली लोकसंख्या ही भारतासमोरील मोठं आव्हान बनलेली आहे. एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या नागरिक नोंदणी डेटा २०२१ मधून ही माहिती उघड झाली आहे. सर्वसाधारणपणे भारतात उच्च जननदरामुळे लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र अचानकपणे हा बदल दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा बदल दिसून आला आहे त्यापैकी बहुतांश जिल्हे हे दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये हा बदल अधिक प्रमाणात दिसून आला आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये एकसारखी नाही आहे. मुख्यत्वेकरून दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसून आली आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान, या क्षेत्रांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या केवळ ७ होती. मात्र २०२१ मध्ये मृत्युदर अधिक आहे अशा जिल्ह्यांची संख्या वाढून ४९ झाली आहे.

या ४९ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जिल्हे हे तामिळनाडूमधील आहेत. २०१९ मध्ये तामिळनाडूमध्ये अशा जिल्ह्यांची संख्या शून्य होती. मात्र २०२१ मध्ये ही संख्या वाढून १७ झाली आहे. तामिळनाडूमध्ये एकूण ३७ जिल्हे आहेत. त्यामुळे हिशोब केल्यास हा आकडा सुमाने ५० टक्क्यांच्या आसपास आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येमधील एका संभाव्य बदलाकडे इशारा करणारी आहे.  मात्र देशातील बहुतांश भागात लोकसंख्या वाढत आहे.  

जन्मदरापेक्षा मृत्युदर वाढण्याची संभाव्य कारणंवाढती वृद्धांची संख्या - दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जन्मदर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच सरासरी आयुर्मान अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. यामध्ये मृत्यूदरात वाढ होऊ शकते.  जन्मदरामध्ये घट - शिक्षण आणि जनजागृतीमुळे या भागामध्ये जन्मदरात लक्षणीय घट झालेली आहे. कोरोनाच्या साथीचा प्रभाव - २०२१ मध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता जन्मदरातील घट ही कोरोनानंतरही कायम राहते की त्यात बदल होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतTamilnaduतामिळनाडू