शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:41 IST

Population Of India: एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात प्रचंड वाढलेली लोकसंख्या ही भारतासमोरील मोठं आव्हान बनलेली आहे. एकीकडे लोकसंख्येमुळे भारताकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध असलं तरी वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणेही तितकेच कठीण बनलेले आहे. अशा परिस्थितीत देशातील ४९ जिल्ह्यांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या नागरिक नोंदणी डेटा २०२१ मधून ही माहिती उघड झाली आहे. सर्वसाधारणपणे भारतात उच्च जननदरामुळे लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मात्र अचानकपणे हा बदल दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा बदल दिसून आला आहे त्यापैकी बहुतांश जिल्हे हे दक्षिण भारतातील राज्यांमधील आहेत. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये हा बदल अधिक प्रमाणात दिसून आला आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये एकसारखी नाही आहे. मुख्यत्वेकरून दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिसून आली आहे. २०१९ ते २०२१ दरम्यान, या क्षेत्रांमध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. २०१९ मध्ये जन्मदरापेक्षा मृत्युदर अधिक असलेल्या जिल्ह्यांची संख्या केवळ ७ होती. मात्र २०२१ मध्ये मृत्युदर अधिक आहे अशा जिल्ह्यांची संख्या वाढून ४९ झाली आहे.

या ४९ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक जिल्हे हे तामिळनाडूमधील आहेत. २०१९ मध्ये तामिळनाडूमध्ये अशा जिल्ह्यांची संख्या शून्य होती. मात्र २०२१ मध्ये ही संख्या वाढून १७ झाली आहे. तामिळनाडूमध्ये एकूण ३७ जिल्हे आहेत. त्यामुळे हिशोब केल्यास हा आकडा सुमाने ५० टक्क्यांच्या आसपास आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येमधील एका संभाव्य बदलाकडे इशारा करणारी आहे.  मात्र देशातील बहुतांश भागात लोकसंख्या वाढत आहे.  

जन्मदरापेक्षा मृत्युदर वाढण्याची संभाव्य कारणंवाढती वृद्धांची संख्या - दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जन्मदर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. तसेच सरासरी आयुर्मान अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. यामध्ये मृत्यूदरात वाढ होऊ शकते.  जन्मदरामध्ये घट - शिक्षण आणि जनजागृतीमुळे या भागामध्ये जन्मदरात लक्षणीय घट झालेली आहे. कोरोनाच्या साथीचा प्रभाव - २०२१ मध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता जन्मदरातील घट ही कोरोनानंतरही कायम राहते की त्यात बदल होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  

टॅग्स :IndiaभारतTamilnaduतामिळनाडू